आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जी करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी‎:परीक्षा केंद्रावर शिक्षक‎ उशिरा पोहोचल्याने गोंधळ‎

मोताळा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दहावीच्या परीक्षा केंद्र‎ असलेल्या जिजामाता कन्या‎ शाळेवर उर्दू शाळेचा शिक्षक‎ कर्तव्यावर उशीरा पोहोचल्याने‎ विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता.‎ तसेच पेपर सुरू होण्यापूर्वी‎ विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या अडी‎ अडचणीत आवश्यक असलेले‎ मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी‎ दडपणाखाली पेपर सोडवल्यामुळे‎ विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.‎ त्यामुळे संबंधित शिक्षकावर‎ कारवाई करण्यात यावी, अशी‎ मागणी पालकांनी केली आहे.‎ येथील जिजामाता कन्या शाळेवर‎ दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र‎ आहे. या केंद्रावर उर्दू व मराठी‎ माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत‎ आहेत. त्यामध्ये जवाहर उर्दू‎ हायस्कूलचे जवळपास तीस पेक्षा‎ जास्त विद्यार्थी असल्याने जवाहर‎ उर्दू हायस्कूलच्या एका शिक्षकाची‎ त्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती‎ करण्यात आली आहे.

वास्तविक‎ पाहता परीक्षा केंद्रावर शिक्षकांना‎ दहा वाजता तर विद्यार्थ्यांना साडेदहा‎ वाजेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना‎ देण्यात आल्या आहेत. दरम्यान‎ शुक्रवारी ३ मार्च रोजी मराठी‎ विषयाच्या पेपरला जवाहर उर्दू‎ हायस्कूलकडून नियुक्त करण्यात‎ आलेला एक शिक्षक सकाळी सव्वा‎ अकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर‎ पोहोचला नाही. त्यामुळे‎ नाइलाजास्तव केंद्र प्रमुखास त्यांच्या‎ ठिकाणी इतर शिक्षकाची नियुक्ती‎ केली. शिक्षक उशिरा परीक्षा केंद्रावर‎ पोहोचल्यामुळे उर्दू माध्यमाच्या‎ विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी‎ आलेल्या अडचणी ऐकून घेऊन‎ त्यांचे निरसन करण्यासाठी उर्दू‎ माध्यमाचे शिक्षक वेळेवर उपलब्ध‎ नसल्याने विद्यार्थी गोंधळुन गेले‎ होते.

तसेच मराठी माध्यमातील‎ शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना‎ व्यवस्थीत हाताळला न आल्याने‎ विद्यार्थ्यांना दडपणाखाली पेपर‎ सोडवावा लागला. त्यामुळे‎ विद्यार्थ्यांचे कधीही न भरून‎ निघणारे शैक्षणीक नुकसान झाले‎ आहे. या बाबत इसा खान, मलंग‎ शाह, शे. जावेद, शे. शफिक व म.‎ इक्बाल या पालकांनी जवाहर उर्दू‎ शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे‎ लेखी तक्रार करीत त्या शिक्षकावर‎ कारवाईची मागणी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...