आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील संजय नगर भागात नगरपालिकेच्या माध्यमातून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने केली आहे. आज, दि. ५ जानेवारी रोजी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला याबाबत निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा िदला. संजय नगर भागातील दूषित पाण्याच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गोरे यांना निवेदन दिले.
यावेळी त्यांच्याशी चर्चा करून समस्या मांडण्यात आली. जलवाहिनी फुटल्याने नालीतील सांडपाणी त्यामध्ये शिरून संजय नगर भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही दखल घेण्यात आली नाही. पालिका प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. नागरिकांचे आरोगय धोक्यात आल्याने नगर पालिका प्रशासनाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. निवेदनावर शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, शे. राजू आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.