आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ईश्वर चिंतनाचा मनापासून ध्यास घ्यावा‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रारब्धाचा ठेवा, संचिताचा ठेवा‎ कधीही चुकणार नाही. परंतु नशीब‎ हे प्रभू रामरायाच्या आणि‎ सद्गुरूंच्या स्वाधीन करून द्या‎ आणि निर्भयपणे जगा. प्रत्येकाचा‎ प्रपंच आज अडचणीत आहे. असून‎ सुद्धा सुखी नाही आणि नसून सुद्धा‎ सुखी नाही, अशी स्थिती सर्वत्र‎ आहे. हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार‎ नाही. त्यामुळे ईश्वर चिंतन सोडू‎ नका, ईश्वर चिंतनाचा मनापासून‎ ध्यास घ्या, असे मार्गदर्शन समर्थ‎ सद्गुरू श्रीहरी महाराज यांनी केले.‎ प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी‎ साडेतेरा कोटी रामनाम जप‎ संकल्पपूर्ती यज्ञ सोहळा समर्थ सद्गुरु‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ श्रीहरी महाराज यांच्या आशीर्वादाने‎ राम उपासक मंडळाच्या वतीने‎ शहरातील आरास ले आउट भागातील‎ हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित‎ केला होता.

तीन दिवस विविध धार्मिक‎ कार्यक्रमात ईश्वर निष्ठांची,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भाविकांची मांदियाळी जमली होती. २‎ फेब्रुवारीला महाप्रसादाने या‎ सोहळ्याची सांगता करण्यात आली.‎ याप्रसंगी हजारो भाविकांनी‎ महाप्रसादाचा लाभ घेतला.‎ दरम्यान समर्थ सद्गुरु श्रीहरी‎ महाराजांनी भाविकांना कापड‎ प्रसादाचे वितरणही केले. या वेळी‎ मुख्य मार्गदर्शन करताना समर्थ सद्गुरु‎ श्रीहरी महाराज म्हणाले, की देव,‎ दानव आणि मानव यांचा कलह‎ संपणार नाही. देवाचे नाव‎ घेणाऱ्यांनाही आज नाव ठेवले जात‎ आहे, शिव्या घातल्या जात आहेत.‎ आपापसात प्रेम-भाव वाढवा.

प्रपंच‎ सोडू नका तो, नेटाने करा. आज‎ मुले-मुली आईवडिलांचे ऐकत‎ नाहीत. वृद्धांना घराबाहेर काढले जात‎ आहे. त्यामुळे संस्काराचे बीजारोपण‎ आवश्यक करा. भगवंत दयाळू आणि‎ कृपाळू आहे. तो कृपा करेलच.‎ प्रत्येकाच्या मनात ईश्वराचा, देवाचा‎ अंश आहे. आत्मा हाच परमात्मा‎ आहे. आज संतांमध्ये देखील भेदाभेद‎ करण्यात येत आहे. मुळात सर्व संत‎ एकच आहेत. आणि ईश्वराच्या‎ प्राप्तीचाच मार्ग त्यांनी दाखवला आहे.‎

ईश्वरावर मनापासून श्रद्धा ठेवा आणि‎ निर्भयपणे जगा, दररोज त्याचे‎ नामस्मरण आवर्जून करा, असे‎ मार्गदर्शन त्यांनी केले. तत्पूर्वी, पहाटे‎ श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर‎ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात‎ आला. या वेळी मलकापूर येथील डॉ.‎ व्ही. के. जोशी यांचे प्रवचन व गुलाल‎ कार्यक्रम पार पडला. सकाळी ८‎ वाजता श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञ‎ पूर्णाहुती देण्यात आली. त्यानंतर‎ ज्ञानेश्वर माऊली महाराज निरपूरकर‎ यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी‎ नैवेद्य आरती झाल्यावर महाप्रसादाने‎ या सोहळ्याची सांगता केली.‎

बातम्या आणखी आहेत...