आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत पीक विमा:अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून चक्काजाम‎

मंगरुळपीर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील एकही पीक हातात पडले‎ नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडले असताना‎ शासनाकडून अद्याप अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही.‎ महसूल विभागाने सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात‎ अद्याप जमा न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.‎ यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, मात्र नुकसानीची‎ तक्रार करूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत‎ नुकसान भरपाई दिलेली नाही. राज्य शासनाने नियमित‎ कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून‎ जाहीर केले.

मात्र शेतकरी या अनुदानाच्या अजूनही या‎ लाभापासून वंचित असल्याने शेलुबाजार परिसरातील‎ शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी दि. ६ शेलुबाजार चौकात‎ चक्काजाम आंदोलन केले.‎ पीक विमा भरूनही आज लाखो शेतकरी‎ पीकविम्यापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या‎ पिकाचे पंचनामे होऊनही अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यात पीक‎ विम्याची रक्कम जमा झालेली नाही. शासनाकडून काही‎ शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत प्राप्त झाली तर काही‎ शेतकरी आजही अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत.‎ अतिवृष्टी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात‎ येत्या पंधरा दिवसात शासनाने त्वरित जमा करावी.

अन्यथा‎ पंधरा दिवसानंतर शेकडो शेतकऱ्यांसह चक्का जाम‎ आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे अर्जुन भीमराव सुर्वे‎ यांनी दिला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विमा कंपनीने वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या‎ प्रमाणात फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी विम्याची‎ ठरावीक रकमेचा भरणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या‎ खात्यात कमी रक्कम जमा केली. तसेच अनेक शेतकरी‎ नुकसान भरपाईस पात्र असतानाही कंपनीने त्यांच्या खात्यात‎ एक रूपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज‎ राज्य सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले.‎ यावेळी शेलुबाजार परिसरातील पीकविमा भरलेल्या‎ पाचशेंहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या पावत्या पीक‎ विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे देण्यात आल्या.‎

प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकरी आपल्या‎ हक्कापासून वंचित असल्याने आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त‎ केला. दरम्यान, मंगरुळपीरचे नायब तहसीलदार यांच्या‎ आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मधुकर डोके, सुनील राऊत, मारोती खुले, देविदास जाधव,‎ रामराव वाघमारे, दिलीप राऊत, रामा लांभाडे, गोवर्धन‎ पाटील, अशोक हांडे, चंद्रशेखर जयभाय, गोपाल राऊत,‎ प्रताप जायभाय, श्याम बोथे, नंदू येवले, गौरव येवले, ओम‎ येवले, सार्थक येवले, सौरव येवले, प्रज्वल येवले, प्रफुल‎ येवले, माणिक सुर्वे, गजानन सुर्वे, गोपाल सुर्वे, बालू सुर्वे,‎ हरी सुर्वे, तेजेश सुर्वे, अण्णा खांनझोडे, भूषण सुर्वे, पांडुरंग‎ राऊत, बोला राऊत, दयाराम राऊत (सरपंच पिंपरी), सुभाष‎ राऊत, गजानन सुर्वे आदींसह शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते‎ उपस्थित होते. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने‎ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा न केल्यास‎ उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात जाऊन आत्मदहन‎ करू, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे‎ गट) अर्जुन भीमराव सुर्वे यांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...