आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरीष्ठ कार्यालयाला‎ अहवाल सादर:"गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई‎ न दिल्यास रास्ता रोको करणार''‎

बुलडाणा‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयनगर परिसरातील २५ ते ३० खेडे‎ गावांतील शेत शिवारात २८ डिसेंबर‎ रोजी झालेल्या गारपिटीमुळे तब्बल‎ सात हजार शेतकऱ्यांच्या तीन हजार‎ दोनशे हेक्टर वरील संत्रा,तूर गहू‎ हरबरा, कांदा पपई यासह इतर‎ पिकांचे अतोनात नुकसान झाले‎ होते. महसूल, कृषी तथा पंचायत‎ विभागाच्या अधिकारी व कर्मचारी‎ यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे‎ करत तहसीलदार, तालुका कृषी‎ अधिकारी, तसेच गटविकास‎ अधिकारी यांनी वरीष्ठ कार्यालयाला‎ अहवाल सादर केले.

परंतु‎ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई‎ मिळाली नाही. तेव्हा नुकसान‎ भरपाई न मिळाल्यास १५ मार्च रोजी‎ रास्ता रोको करण्यात येईल, असा‎ इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.‎ अद्यापही शेतकऱ्यांना‎ नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे‎ उदयनगर परिसरातील शेतकऱ्यांसह‎ सर्वपक्षीय संघटनांच्या पुढाकारातून‎ येत्या १४ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना‎ नुकसानभरपाई न मिळाल्यास न्याय‎ हक्क मागण्यांसाठी १५ मार्च रोजी‎ खामगाव चिखली राष्ट्रीय महामार्ग‎ वरील उदयनगर चौफुली वर रास्ता‎ रोको करण्याचा इशारा‎ जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दोनशे‎ शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात‎ आले.‎

यावेळी मुरलीधर क्षिरसागर, चक्रधर‎ लांडे, राम डहाके, मनोज‎ लहुडकार, दिगंबर राऊत, महादेव‎ ठाकरे, अमोल बोरपी, जितू‎ पुरोहित,संतोष पाटील, किरण‎ दानवे, अक्रम खासाब, राजू राठी,‎ शे.रफिक, हेमंत परखेडे, राजेश‎ बिडवे, ज्ञानेश्वर पाटील, संजय‎ धुरंधर, अनिल अंभोरे, बंडू बिडवे,‎ रवींद्र डाळिंमकर,आकाश‎ राऊत,गणेश भगत,सुदाम बराटे,‎ दत्ता चोपडे, दिवाकर कोरडे,‎ पुरुषोत्तम अवचार,शे.फकिरा‎ शे.उस्मान,विनोद बोरपी, लक्ष्मीकांत‎ बराटे,गजानन काळे,महावीर‎ जैन,शे.शब्बीर शे.करीम यांच्यासह‎ बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...