आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:प्रयत्नांच्या पराकाष्ठेतूनच‎ असाध्य बाबी साध्य होतात‎

बुलडाणा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू श्रीरामाच्या चरित्राचे मानवी‎ जीवनात अनन्य महत्त्व तथा प्रभाव‎ असून रामाचे गुण प्रत्येकाने‎ अंगीकृत करावे. श्रीरामांनी विविध‎ संकटांचा सामना प्रयत्नांच्या‎ पराकाष्टेतून केला. अभ्यासाअंती‎ प्रयत्न केल्यास असाध्य बाबी साध्य‎ होतात हे दर्शवितात. याचप्रमाणे‎ आदर्श शिष्य, पुत्र, बंधू, पती, मित्र,‎ आदर्श राजा ते आदर्श शत्रू या‎ श्रीरामांच्या पात्रांचा आदर्श‎ पिढ्यांपिढ्या दिपस्तंभा सारखा‎ तेवत राहील, असे प्रबोधन काँग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.‎

कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे‎ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनुराधा‎ परिवाराने आयोजित केलेल्या १३‎ दिवशीय समाजोपयोगी‎ कार्यक्रमांतर्गत स्व. तात्यासाहेब बोंद्रे‎ लिखीत तत्वबोध रामायण या‎ विषयावर चार दिवशीय पुष्प‎ आयोजन करण्यात आले होते.

यात‎ महर्षी वाल्मीकी रचित‎ रामायणातील अयोध्याकांड,‎ बालकांड, अरण्यकांड,‎ किश्किंदाकांड, सुंदरकांड, युद्धकांड‎ या विषयी निरूपण तथा वैज्ञानिक‎ दृष्टीकोन व अंधश्रध्दा या विषयी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व्याख्यान करण्यात आले. यावेळी‎ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद‎ टाले, सिद्धेश्वर वानेरे, डॉ. के. आर.‎ बियाणी, डॉ. अरुण नन्हई, तर‎ उपसंहार संवाद राहुल बोंद्रे यांनी‎ साधला.‎ सुंदरकांड पुष्प गुंफताना यातील‎ नायक महाबली हनुमान यांचे महान‎ कार्य विषद करीत, हनुमान रामेश्वर‎ ते लंकेत रावणाच्या महालापर्यंत,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तेथुन अशोक वाटिका विध्वंस,‎ रावणपुत्र अक्षय संघर्ष, ब्रम्हास्त्र‎ वापरातून बंदिस्त केले हनुमान,‎ लंका दहन, आदींवर प्रबोधन‎ करण्यात आले. व्यसनमुक्त राम‎ राज्य, परस्पर बंधुभाव, समता,‎ विद्वानांचा सन्मान, माता पिता गुरू‎ यांचा आदर, या जिवन प्रवासात‎ प्रयत्नांच्या पराकाष्टेमुळेच‎ श्रीरामाने आलेल्या विविध‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संकटांवर केलेली मात, श्रीरामांची‎ गुणग्राह्यता प्रयत्नवाद मानवाने‎ अंगीकृत करावा, श्रीरामाला दैवी‎ रूपात न स्विकारता मानवी‎ प्रयत्नवादाचा महामेरू म्हणुन‎ बघण्यात यावे, आदी विषयी‎ निरूपण करण्यात आले. तर या‎ चार ही पुष्प निरूपण प्रसंगी‎ समारोपीय उपसंहार संवाद राहुल‎ बोंद्रे यांनी साधला.‎

स्व. तात्यासाहेबांच्या जीवनाचा आदर्श अंगीकारा‎
तत्वबोध रामायणकार स्व. तात्यासाहेब यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल २२ वर्षे वानप्रस्थ स्वीकारून व्रतस्थ जीवन‎ जगले, त्यांच्या व्रतस्थ जीवनातुन झालेल्या उर्जा प्राप्तीमुळेच शैक्षणीक, सहकार, सामाजिक इत्यादींच्या माध्यमातुन‎ अनुराधा परिवाराच्या संस्था उभारल्या गेल्या. स्व तात्यासाहेब यांच्या व्रतस्थ वानप्रस्थ जिवनाचा आदर्श अंगीकृत करीत‎ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, त्यांनी मानवसेवेबरोबरच सामाजिक क्रांती घडवण्याकरिता दिलेली शिकवण आयुष्यभर‎ प्रेरणादायी ठरेल असे चार दिवसीय तत्वबोध रामायण निरूपण उपसंहाराच्या माध्यमातुन राहुल बोंद्रे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...