आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना कृषि पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण विभागाने गतिमान कारवाई केली असून केवळ दीड महिन्यात २७ हजार ९८० नवी कनेक्शन दिली आहेत. शेतकऱ्यांच्या पेड पेंडिंग चा प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण वेगाने प्रयत्न करत आहे, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
शेतकऱ्यांनी कृषि पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. त्याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार महावितरणने विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली. महावितरणने ३१ मार्च अखेर कृषि पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित १ लाख ८० हजार १०६ अर्जांपैकी ८२ हजार ५८४ कनेक्शन एप्रिल २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत दिली आहेत. यापैकी २७ हजार ९८० जोडण्या या नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचे या पंचेचाळीस दिवस एवढ्या कमी कालावधीत दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.