आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शहराला पिवळ्या, अशुद्ध पाणी‎ पुरवठ्याविरुद्ध मनसेचा "एल्गार ''‎

चिखली‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात होणाऱ्या पिवळ्या आणि अशुद्ध पाणी‎ पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण‎ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष‎ नारायणबापू देशमुख यांच्या नेतृत्वात‎ मंगळवारी, दि. २८ रोजी नगर पालिकेला‎ निवेदन दिले. पालिकेने शुद्ध, स्वच्छ‎ पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा‎ इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.‎ अशुद्ध तसेच पिवळ्या पाण्यामुळे‎ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला‎ असून, अनेकांना किडनी स्टोन, पोटाच्या‎ विकारांसह इतर आजार झाले आहेत. पालिका‎ प्रशासन दरवर्षी नळ धारकांकडून पाणी कर‎ वसूल करते. परंतु, वर्षातून केवळ १० ते २०‎ दिवसच पाणी पुरवठा करते. नागरिकांना काही‎ दिवसच पाणीपुरवठा होत असून, नळपट्टी पूर्ण‎ वर्षभराची आकारली जात आहे.

त्यामुळे शुद्ध,‎ स्वच्छ आणि नियमितपणे तीन-चार‎ दिवसांआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे.‎ मात्र, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दूषित‎ व अशुद्ध व पिवळ्या पाण्याचा पुरवठा केला‎ जातो, असे या निवेदनात म्हटले आहे. शहरास‎ स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास‎ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा‎ निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.‎ निवेदन देताना नारायणबापू देशमुख, उप‎ तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप शहराध्यक्ष‎ रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास,‎ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल अस्वले,‎ अंकित कापसे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...