आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासवाटा:संत्रा प्रक्रिया उद्याेगामुळे‎ फळबागांकडे वाढणार कल‎

लक्ष्मीकांत बगाडे | बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फलोत्पादन क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्यात‎ एक लाख २५ हजार ५६३ टनाचे‎ उत्पादन विविध फळांपासून होत‎ असून, संत्रा फळाचे उत्पादन‎ सर्वाधिक ७७ हजार ५९० मेट्रिक टन‎ इतके आहे. संग्रामपूर तालुक्यात‎ सर्वाधिक संत्र्याच्या बागा आहेत. संत्रा‎ प्रक्रिया उद्योगामुळे फळबागांकडे कल‎ वाढणार असला तरी हा उद्योग‎ शेतकऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात‎ येणार की, उद्योजकांच्या हे मात्र‎ निश्चित झाले नाही. शेतकरी गटांच्या‎ माध्यमातून हा उद्योग सुरू‎ करण्यासाठी कृषी विभागाचा आत्मा‎ हा विभाग मात्र सज्ज आहे. कृषी‎ विभागाकडे मात्र या उद्योगासाठी‎ एकही अर्ज दाखल झाला नाही.‎ फळबाग लागवडीसाठी‎ शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय‎ रोजगार हमी योजनेअंतर्गत प्राधान्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देण्यात येते.

या वर्षी १३४९.२५ हेक्टर‎ क्षेत्रावर चार लाख ९५ हजार ८३४‎ कलमे, रोपांची लागवड करण्यात‎ आली. यामध्ये आंबा, केळी, चिकू,‎ डाळिंब, मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू,‎ चिंच, सीताफळ, आवळा, बोर रोपे,‎ जांभूळ, अंजीर इत्यादी फळांचा‎ समावेश आहे. सर्वाधिक लागवड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संत्रा फळांची झाली आहे. ५८७.३५‎ हेक्टर क्षेत्रावर दोन लाख ८ हजार ८९०‎ कलमांची लागवड ६८४ शेतकऱ्यांनी‎ केली आहे. हा भाग बहुतांश संग्रामपूर‎ व जळगाव जामोद तालुक्यातील आहे.‎ संत्र्याची लागवड अधिक प्रमाणात‎ असल्याने संत्रा प्रक्रिया उद्योगातून‎ शेतकरी हित साधले जाण्याची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शक्यता आहे. २० कोटी रुपये या‎ उद्योगासाठी मिळणार असले तरी ते‎ कसे मिळणार याची अजूनही माहिती‎ उपलब्ध होणे बाकी आहे. मलकापूर,‎ नांदुरा, शेगाव, देऊळगावराजा या‎ भागात संत्रा लागवड केली नाही.‎ मेहकर व सिंदखेडराजा या भागात यंदा‎ सर्वाधिक लागवड करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...