आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षीच्या घरकुल यादीमध्ये ग्रामपंचायतनिहाय अल्पसंख्यांकांची घरकुले मंजूर झाली नाही. त्यामुळे यावर अनेकांचे संसार उघड्यावर राहतील, पाण्याने भिजतील, या करता तातडीने घरकुल याद्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे . पंचायत समिती अंतर्गत ५७ ग्रामपंचायती आहेत. शंभरहून अधिक गावं आहेत आणि शेकडो अल्पसंख्यांक प्रत्येक गावात राहत आहेत. प्रामुख्याने अल्पसंख्याकांना पक्की घरे नाहीत, पावसामध्ये वीज, वादळ वारा, या संकटांचा सामना जीव मुठीत धरून त्यांना करावा लागतो.
या परिस्थितीत हक्काचा निवारा देणे शासनाची जबाबदारी आहे, मात्र गावनिहाय ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतरही अल्पसंख्याकांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आली नसल्यामुळे यावर्षीचा पावसाळा त्यांना पक्क्या निवाऱ्याशिवाय काढावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात उपसभापती इम्रान खान मुमताज खान यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात आणून दिली आणि अल्पसंख्याकांची घरे तातडीने मंजूर करावी, अशी मागणी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.