आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मन चंगा तो कठौती में गंगा’ असा संदेश ६०० वर्षांपूर्वी देणारे संत रोहिदास महाराजांचे विचार जनमाणसाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन आकोलखेडचे सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संचालक डॉ. प्रभाकर नगराळे होते. ज्येष्ठ नागरिक राधेश्याम झाडे, सोसायटीचे अध्यक्ष दादाराव तायडे, ग्रा. पं. सदस्या पार्वती पदमणे, ग्रा. पं. सदस्य दिनेश गाठेकर, मदन सावळे, अ. जहिद अ. शहिद, रामदास गव्हाळे, रंगराव गावंडे, ज्ञानेश्वर देऊळकर, पोलिस पाटील अमरनाथ शेगोकार, सदानंद सिरसाट यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
संत रोहिदास महाराज यांच्या ६२५ व्या जयंतीचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे राधेश्याम झाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर नगराळे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गव्हाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंगेश देऊळकर, गजानन तायडे, गोपाल धुळे, प्रमोद खंडारे, नंदकिशोर चांदूरकर, रामदास ताडे, रितेश नाथे, रामा लव्हाळे, प्रविण गाठेकर, विशाल खंडारे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.