आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत त्यांच्या विचारांचा जागर होणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांनी केले. माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सुधीर चव्हाण होते. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंढरीनाथ म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात श्री बालाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पुढे बोलताना राजे विजयसिंह जाधव यांनी प्रत्येक व्यक्ती त्याच्यातील विशिष्ट कलागुणामुळे परिचित असतो, असे सागितले. वक्तृत्व हा गुणही अत्यंत महत्त्वाचा असून, स्पर्धेच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सुधीर चव्हाण यांनी विद्यार्थिदशेत आपल्याला जे काही शिकायला मिळेल ते आपण अवगत करावे, असे मत व्यक्त केले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटात आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून श्री व्यंकटेश महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव, देऊळगावराजा कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ. किरण जायभाये व अर्जुन आंधळे यांनी काम पािहले. सूत्रसंचालन सुनंदा कुहिरे हिने केले. माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली तिडके यांनी प्रास्ताविक केले. तर मेघा निकम यांनी आभार मानले. वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन भागवत म्हस्के यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.