आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँक शाखेत व्यवस्थापकपदी (मॅनेजर) कार्यरत असलेल्या उत्कर्ष पाटील (३२) यांचा गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. पाटील यांचा मृतदेह सारंगपूर फाट्यावरील उसाच्या शेतालगत असलेल्या नाल्यात टाकून त्यावर उसाचा पाचोळा, कचरा टाकलेला होता. मुंबईतील असलेले उत्कर्ष पाटील यांची तीन महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर त्यांना मेहकर भागात पाठवण्यात आले होते. स्टेट बँकेच्या हिरडव शाखेत परीविक्षाधीन व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्कर्ष पाटील यांनी कौटुंबिक कारणामुळे नोकरीचा राजीनामा सादर केला होता, अशी माहिती आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.