आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोताळा येथील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेले वरली, मटक्यांचा अवैध व्यवसाय त्वरित बंद करावा, अशी मागणी भूमी हक्क परिषदेच्या वतीने के.जी.शाह यांनी २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे एका निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.
भूमी हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मोताळा शहरातील आठवडी बाजारामध्ये खुलेआम वरली मटक्याची दुकाने थाटलेली असून आठवडी बाजारातील देवीच्या मंदिराला लागून मागे व पुढे मोठ्या प्रमाणात वरली, मटक्याची दुकाने खुलेआम सुरु असून या अवैध व्यवसायाकडे बोराखेडी पोलीसांचे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हे बेकायदेशिर व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे. आठवडी बाजार परिसरात गर्दीत वरली मटक्याच्या पैश्याच्या देवाणी- घेवाणी वरुन अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यातून शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मोताळा शहरात गुरुवार रोजी आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला येतात. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या बाबीची गांभीर्याने दखल घेवुन जिल्हा पोलिस प्रशासनाने तत्काळ वरली मटक्याचा अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने क्रांतीदिनी ९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष के.जी.शाह यांची स्वाक्षरी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.