आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी‎:शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या‎ गाडे बंधूविरूद्ध त्वरीत कारवाई करा‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे‎ थकविणाऱ्या व शेतकऱ्यांची‎ फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर‎ कायदेशीर कारवाई करावी, अशी‎ मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत‎ तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे‎ केली आहे.‎ रविकांत तुपकर यांनी दिलेल्या‎ निवेदनात म्हटले आहे की, चिखली‎ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला‎ शेतमाल चिखलीतील व्यापारी संतोष‎ गाडे व त्यांच्या बंधूंना विकला होता.‎ परंतु गाडे बंधूंनी आपले पैसे‎ आर.टी.जी.एस. करतो किंवा काही‎ दिवसांनी देतो, असे म्हणून मोठ्या‎ प्रमाणात शेतकऱ्यांचे पैसे थकवले‎ आहेत व आता ते फरार असल्याची‎ माहिती आहे.

यासंदर्भात मोठ्या‎ प्रमाणात शेतकरी तक्रारी करत आहेत.‎ शेतकरी मोठ्या विश्वासाने आपला‎ शेतमाल व्यापाऱ्यांना विकतात पण‎ गेल्या काही वर्षांपासून काही‎ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची‎ फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत‎ आहेत. त्यामुळे अशा प्रकारावर आळा‎ घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे‎ गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी शेतकरी‎ व्यापाऱ्यांना आपला माल देतो त्यावेळी‎ व्यापाऱ्यांचा आर.टी.जी.एस.‎ करण्याचा आग्रह असतो तर त्या‎ ऐवजी शेतकऱ्यांना रोखीने पैसे‎ मिळण्याची व्यवस्था असावी.‎ जेणेकरून शेतमाल विकता वेळीच‎ शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे मिळाले तरच‎ शेतकऱ्यांची फसवणूक होणे थांबेल.‎ तसेच फसवणूक करणाऱ्या अशा‎ व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणे‎ आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांची‎ फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंची‎ संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना पैसे‎ मिळवून द्यावे व त्यांच्यावर कायदेशीर‎ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी‎ रविकांत तुपकर यांनी केली आहे.‎