आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील चौदाशे दुकाने उठवल्यानंतर त्यांना पक्की दुकाने बांधून दिली नाहीत तसेच व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मोठे व्यापारी संकुले नाहीत याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. या उपोषणाची पाचव्या दिवशी न.पा.प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. हे साखळी उपोषण लेखी आश्वासनाद्वारे सोमवारी मागे घेण्यात आले. शहरांमध्ये कुठलेही मोठे उद्योगधंदे नसताना युवकांना बेरोजगारीस सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारांना रोजगाराकरिता दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागते. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची मोठी योजना अंमलात आणली नाही.
तसेच शहरातून चौदाशे दुकाने उठवल्यानंतर त्यांना पक्की दुकाने बांधून दिली नाहीत. व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मोठे व्यापारी संकुले नाहीत. सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसाय करायचा तरी कुठे शासन आणि प्रशासन या दोघांचाही शहरातील प्रमुख समस्येकडे दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने हे सुरु होते. हे उपोषण आज सोडवण्यात आले. यावेळी नगर पालिका प्रशासनाद्वारे लेखी आश्वासन देवून सोडवले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.