आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या युगामध्ये संताचे विचार आचरण्यात आणण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक शिवाजीराव काळुसे यांनी केले. येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, गुरु रोहिदासांच्या विचारधारेत मनुष्य हाच धर्माचा केंद्र बिंदू होता. मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा रोहिदास महाराज यांची असल्याचे त्यांनी सांगीतले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या विद्याताई दीपक साळवे, शिवाजीराव काळुसे, प्रतिभाराजे जाधव, दीपक पडुळकर, सखाराम हरकळ, रामेश्वर भानुसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर साळवे यांनी केले.या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक साळवे, माजी तंटामुक्त अध्यक्ष विजय साळवे, दिनेश पारखे, गजानन शिंगणे, माधव शिंगणे, सुनील शिंगणे, दशरथ शिंगणे, भूषण शिंगणे, सुरेश शिंगणे, अशोक शिंगणे, तोताराम शिंगणे, पवन शिंगणे, कारभारी शिंगणे, वसंत साळवे, ज्योती साळवे, माधुरी शिंगणे, गीता डोंगरे, लक्ष्मी पारखे, पूजा कुटे, विठ्ठल कायदे, चांगुणा साबळे, सुंदराबाई शिंगणे, मंगला शिंगणे, रमा शिंगणे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगनलाल शिंगणे यांनी तर आभार प्रदर्शन भरत शिंगणे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.