आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १० उमेदवारांचे अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी रद्द केले होते. त्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या उमेदवारांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला रद्द ठरवत दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या १० माजी संचालक उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी कृबास अधिनियम १९६३ चे कलम ५३ अन्वये रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले होते. या प्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विष्णु पाटील कुळसुंदर व इतर उमेदवारांनी अपील दाखल केली होती.
सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांना कलम ५३ अंतर्गत सदर आदेश पारीत करण्याचा आदेश किंवा अधिकार नाही. अशा स्वरूपाचे ताशेरे ओढीत आदेश ११ एप्रिल रोजी रद्द केले. यामुळे राजकीय दबावापोटी नामांकन अर्ज नामंजूर केलेल्या त्या उमेदवारांना खंडपीठाने दिलेल्या निवाड्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुर खंडपीठाने कलम ५३ चे आदेश रद्द केल्याच्या दिलेल्या निवाड्यामुळे ११ माजी संचालक विष्णु पाटील कुळसुदर, डॉ. सत्येंद्र भुसारी, गजानन पवार, विजय शेजोळ, रूपराव सावळे, ईश्वर इंगळे, संजय गाडेकर, मनोज खेडेकर, सुमनबाई म्हस्के, काशीनाथ बोंद्रे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.