आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल‎:"खोके'' घेणारे गद्दार आज‎ शिवसेनेच्या मुळावर उठले‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सात आठ महिन्यांपासून सत्तेचा जो‎ गैरवापर चालू आहे, तो तुम्ही उघड्या‎ डोळ्यांनी पाहत आहात. आज राज्यात‎ गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता‎ आहे. परंतु हे काही नवीन नाही. यापूर्वी‎ काँग्रेसची सुध्दा सत्ता देशात होती.‎ दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता‎ असताना आणि काँग्रेस तसेच शरद पवार व‎ बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वैमनस्य‎ देखील जनतेस सर्वश्रृत होते. तसेच अनेक‎ जण त्या काळात शिवसेनेतून बाहेर पडले.‎ मात्र त्यातील एकही जण शिवसेनेच्या‎ मुळावर उठला नव्हता, कोणीही शिवसेना‎ संपवण्याची भाषा केली नाही. परंतु आज‎ ज्यांच्या जिवावर मोठे झाले ते एकनाथ शिंदे‎ व त्यांच्यासोबतचे गद्दार फितूर होवून‎ शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत.‎

शिवगर्जाना सप्ताहानिमित्त सध्या‎ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते‎ महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. शिवसेना‎ नेत्या सुषमा अंधारे या विदर्भ दौऱ्यावर‎ असून १ मार्च रोजी येथील गांधी चौकात‎ सायंकाळी ५ वाजता त्यांची जाहीर सभा‎ झाली. यावेळी त्या शिवसैनिकांना संबोधित‎ करत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क‎ प्रमुख नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, लोहबन्धे,‎ वसंतराव भोजने, जालिंधर बुधवत, संतोष‎ तायडे, अविनाश दळवी, दत्ता वाघमारे, रवि‎ भोजने आशिष रहाटे, बंडू बोदडे, रवि‎ महाले, विजय इंगळे, श्रीराम खेलदार‎ यांच्यासह तेजेंद्रसिंह चौहाण, गणेश माने,‎ अशोक हटकर, विशाखा सावंग, भीकुलाल‎ जैन, सुभाष ठाकूर, गौतम गवई उपस्थित‎ होते. पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी‎ बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव‎ जाधव, आमदार संजय रायमूलकर व संजय‎ गायकवाड यांच्या बद्दल बोलताना म्हणाल्या‎ की, या तिघांना मातृतीर्थ बुलडाणा‎ जिल्ह्याला खोक्यांच्या ओळखीशी जोडले‎ असून, त्यांना जनता माफ करणार नाही.‎

सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत‎ असताना हे चुन चुन के मारेंगेची भाषा‎ करतात. तर खासदार म्हणतात महागाई कुठे‎ वाढली खर्च वाढला आहे. त्यामुळे‎ निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या,‎ भाजप व शिंदे सरकार सर्व निवडणुका पुढे‎ लोटत असून त्यांना सरकार पडण्याची भीती‎ आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज रहावे,‎ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सभेला‎ जिल्हाभरातून शेकडो शिवसैनिक व‎ खामगावकर उपस्थित होते. सभेचे‎ सूत्रसंचालन रवि महाले यांनी तर आभार‎ प्रदर्शन विजय इंगळे यानी केले. सभेसाठी‎ धीरज कंठाले, संतोष सावंग, शंकर खराडे,‎ विजू बोरडे, संतोष करे, आनंद चिंडाले‎ यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...