आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदिल:बदलत्या वातावरणामुळे तीन लाख‎ 14 हजार 948 हेक्टर पिके संकटात‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीपातील एक लाखापेक्षा अधिक‎ हेक्टरवरील पिकांना यंदा फटका‎ बसला असतानाच धुके पडणे,‎ थंडगार वारा सुटणे, गरम होणे अशा‎ विविध कारणांमुळे यंदाचे रब्बी पिके‎ अडचणीत येण्याची शक्यता आहे.‎ गहु पिकांना अडचण येत असताना‎ हरभरा पिकांवरही घाटेअळीचा‎ प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.‎ जिल्ह्यात रब्बीचा पेरा तीन लाख १४‎ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर झाला‎ असून यामध्ये हरभऱ्याचा पेरा दोन‎ लाख २४ हजार २० हेक्टरवर‎ करण्यात आला आहे.‎

जिल्ह्यामध्ये हवामानातील‎ बदलामुळे हरभरा पिकावर घाटे‎ अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.‎ हरभऱ्याचे पीक सध्या हे काही‎ ठिकाणी वाढीच्या तर काही ठिकाणी‎ फुलोरा अवस्थेत आहे. यादरम्यान‎ घाटे अळीच्या प्रादुर्भाव झाला आहे.‎ ही अळी पानावरील हरीत द्रव्य‎ खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम‎ पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात‎ आणि गळून पडतात. थोड्या मोठ्या‎ झालेल्या अळ्या संपूर्ण पाने आणि‎ कोवळी देठे खाऊन फस्त करतात.‎ त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच‎ शिल्लक राहतात.‎ वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ‎ नये यासाठी बिबी येथील शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करताना.‎

पक्षी आणू शकतात घाटे अळी नियंत्रणात‎ या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना घाटे अळीचे‎ परभक्षक बगळे, मैना, राघो, नीळकंठ, काळी चिमणी‎ इत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे‎ पिकावरील नियंत्रण करतात. तर अवाजवी‎ कीटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी‎ कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत.‎ त्यामुळे कीटकनाशकांचा जास्त वापर टाळावा. ज्या‎ शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून‎ उपयोग केला नसेल, त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी‎ थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये‎ लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे‎ होते. घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी पहिली फवारणी ५०‎ टक्के फुलोऱ्यावर असताना करावी.‎

वन्य प्राण्यांचे संकट बळावले‎ माकडांचाही उच्छाद सुरु झाला आहे. ते सुध्दा‎ दाणे भरलेले हरबरे खाऊन पीक नष्ट करत आहेत.‎ वन्य प्राण्यांचाही हैदोस वाढला आहे. रोही, हरीण‎ यांचे कळप येऊन रब्बीचे पीक उद्ध्वस्त करत‎ आहे. त्याचा कोठे अहवाल घेतला जात नाही. या‎ प्राण्यांना इजाही पोहोचवले जात नाही. कारण‎ त्यासाठी कायदे आडवे येतात. परंतु, शेतकऱ्यांनी‎ पिकांवर होणारे अळयांचा प्रादुर्भाव लक्षात घ्यावा‎ की, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करावे हा‎ प्रश्नच आहे. अळयांपासून संरक्षण एकदा‎ करण्यासाठी उपाययोजना होऊ शकते. पण वन्य‎ प्राण्यांचे काय.‎ बाबुराव नरोटे, शेतकरी संघटना‎

हरभरा लागवड अशी‎
लोणार १७९८०‎ खामगाव १५२१२‎ शेगाव १६०४७‎ मलकापूर ५३७८‎ मोताळा ५५६३‎ नांदुरा ४३४१‎ जळगाव जामोद ५४१३‎ संग्रामपूर ७५८७‎ चिखली ४२९६०‎ बुलडाणा ४१३७८‎ देऊळगाव राजा ७३३९‎ मेहकर ३८६५५‎ सिंदखेड राजा १६१७०‎

बातम्या आणखी आहेत...