आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:झिजणे अन् जळणे हे रमाईंकडून शिकण्यासारखे‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक म्हणतात की माणसाने चंदनासारखे‎ झिजावे आणि मेणबत्ती प्रमाणे जळावे.‎ चंदनाचा सुवास दरवळतो अन् मेणबत्ती‎ छोटी असली तरी प्रकाश देऊन मार्ग‎ दाखवते. ही म्हण चंदनाने झिजावे अन्‎ मेणबत्तीने जळावे हे माता रमाईंकडून‎ शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन मंजूश्री‎ खोब्रागडे यांनी व्यक्त केले. या वेळी‎ डॉ.कृत्तिका अक्षय हिरे यांनीही माता‎ रमाईच्या त्यागामुळेच आपण आज‎ रुग्णसेवेत राहुन जनसेवा करत असल्याचे‎ सांगत महिलांना आरोग्य जोपासण्याचा‎ सल्ला दिला‎ रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या‎ शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समाज कल्याणच्या सांस्कृतिक भवनात‎ आज रविवार, ५ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‎ यावेळी डॉ. अस्मिता मनवर, प्रा.प्रतिभा‎ शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

रमाईंबद्दल या मान्यवर महिलांनीही आपल्या‎ भावना व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानावरून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मंजूश्री खोब्रागडे या बोलत होत्या. यावेळी‎ त्या म्हणाल्या की, प्रत्येक महापुरुषांच्या‎ पाठीमागे ही एका स्त्रीचा त्याग असतो.‎ बाबासाहेबांना ज्ञानसूर्य बनवण्यासाठी‎ रमाईंचा मोलाचा वाटा आहे.‎ क्रांतीच्या रथावर बाबासाहेब आरुढ झाले ते‎ माता रमाईंच्या सहकारामुळे व त्यागामुळे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माता रमाईंमध्ये असे अभूतपूर्व गुण होते‎ ज्यामुळे त्या कोट्यवधी जनतेच्या आई‎ झाल्या.‎

स्त्रीयांनी आरोग्याची काळजी‎ घ्यावी : डॉ. कृत्तिका हिरे‎ आज सुदैवाने त्यांच्या त्यागातूनच आपण या‎ समाजात वावरतो आहोत. घरातील स्त्री‎ आजारी पडली म्हणजे सर्व घरच आजारी‎ पडते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची‎ काळजी घेतली पाहिजे. आज आपण जे‎ आहे ते रमाईंमुळे आहोत. या‎ बुलडाणेकरांनीही आपले सासरे‎ डॉ.पंजाबराव हिरे यांना सामावून घेतले. तसे‎ आपल्यालाही सामावून घ्यावे, असे मत‎ डॉ.कृत्तिका अक्षय हिरे यांनी व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...