आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारात दस्तनोंदणी‎:शेतकऱ्यांना सलोखा योजनेतून‎ मुद्रांक, नोंदणी शुल्क माफी‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतजमिनीचा ताबा आणि‎ वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील‎ आपसातील वाद मिटवण्यासाठी‎ सलोखा योजना उपयुक्त ठरणार आहे.‎ परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत‎ मुळ मालकाकडे करण्यासाठी आता‎ सलोखा योजनेतून नाममात्र एक हजार‎ रूपयांत दस्त नोंदणी होणार आहे.‎ अशी माहिती महसूल विभागाने दिली‎ आहे.‎ शेतजमिनीच्या वहिवाटीवरून‎ होणारे वाद वाढत आहे. यावर‎ उपाययोजना म्हणून हे वाद मिटवणे‎ आणि समाजात सलोख्याचे वातावरण‎ निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी‎ ठरणार आहे.

यामुळे एकमेकांमधील‎ सौख्य आणि सौहार्द वाढीस‎ लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या‎ नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या‎ शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या‎ शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा‎ ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या‎ शेतजमिनधारकांचे अदलाबदल‎ दस्तांसाठी नोंदणी शुल्क एक हजार‎ रूपये नाममात्र आकारण्याबाबत‎ सवलत देण्याची सलोखा योजना ३‎ जानेवारी २०२३ पासून राबवण्यात येत‎ आहे.‎ सदर योजना अधिसूचना राजपत्रात‎ प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन‎ वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. योजनेचा‎ लाभ घेण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांचा‎ एकमेकांच्या जमिनीवरील ताबा‎ किमान १२ वर्षांपासून असणे आवश्यक‎ आहे. एकाच गावात जमिन धारण‎ करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे‎ मालकी आणि ताबा असल्याबाबतचा‎ पंचनामा मंडळ अधिकारी आणि‎ तलाठी यांनी करुन दस्त नोंदणीच्या‎ वेळी दस्तासोबत जोडणे बंधनकारक‎ आहे.‎

या योजनेमुळे सकारात्मक‎ मानसिकता होऊन जमिनीच्या‎ विकासाला चालना मिळणार आहे.‎ तसेच शेतकऱ्याचे वैयक्तिक आणि‎ राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन‎ न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे निकाली‎ निघून शेतकरी, न्यायालय आणि‎ प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचणार‎ आहे. सलोखा योजना ही‎ शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे‎ योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या‎ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन‎ वाद मिटवून सामाजिक सौख्य आणि‎ सौहार्द वाढवण्यास हातभार लावावा,‎ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल‎ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎