आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूविक्रीवरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी जवळपास ४० महिला जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. रमाई नगर येथील महिलांनी बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, जानेफळ येथील माता रमाई नगरात काही जण अवैधरीत्या दारूविक्री करत असल्याने महिलांसह सर्वसामान्यांना त्रास होत आहे. उघडपणे दारूविक्री होत असल्याने तिथे काही लोकांमध्ये वादही होतात.
काही गुंड प्रवृत्तीचे लोक कायद्याला न जुमानता अवैधरीत्या दारूची विक्री करत आहेत. ज्या ठिकाणी अवैध दारूची विक्री केली जाते, तेथून विद्यार्थी व विद्यार्थिनी श्री सरस्वती शाळेत जात असतात. अशावेळी काही जण दारूच्या नशेत असल्याने महिला व विद्यार्थिनींबाबत लज्जास्पद कृत्य करत असतात. परिणामी सामाजिक भावना दुखावल्या जाऊन गावात अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महिलांनी या निवेदनाच्या प्रती संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही दिल्या आहेत.
दारू विक्री बंद न झाल्यास शहर बंद ठेवण्याचा इशारा या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. दि. ७ फेब्रुवारीपर्यंत अवैध दारूविक्री बंद न झाल्यास याच्या निषेधार्थ जानेफळ बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही महिलांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.