आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:तरुणांनो, मातीशी नाळ कधीच तोडू नका‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरण्यापूर्वी देशासाठी काय केले हे‎ सांगता आले पाहिजे. जीवनात देशासाठी‎ शक्य होईल ते प्रयत्न करा. सोबतच‎ मातीची नाळ कधीच तोडू नका. असे‎ सांगून माती कधी सेकंड हॅन्ड होत नसते.‎ मातीची नाळ जोडतो तो देशसेवाच‎ करीत असतो, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.‎ हिम्मतराव बावस्कर यांनी केले.‎ डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा सन्मान‎ आज शहरातील माँ जिजाऊ अर्बनच्या‎ वतीने करण्यात आला. डॉ. बावस्कर‎ यांनी विंचू व सर्प दंश यावर जागतिक‎ कीर्तीचे संशोधन करून लाखोंना‎ जीवदान देण्याचे काम केले.

याबद्दल‎ भारत सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री हा‎ देशाचा मनाचा किताब देऊन गौरवांकित‎ केले आहे. दरम्यान, आज ते शहरात‎ आले असता माँ जिजाऊ अर्बन‎ परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार‎ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष‎ स्थानी संस्थाध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड हे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होते. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष‎ बाळाभाऊ भोंडे, हभप डॉ. विकास‎ बाहेकर, हभप भिकाजी तायडे,‎ रणजितसिंग राजपूत, संस्था उपाध्यक्ष‎ शिवाजी तायडे, सचिव नितीन जाधव,‎ रामेश्वर साखरे, डॉ. शरद काळे, विलास‎ भगत व पत्रकार गणेश निकम यांची‎ उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले‎ की, बुलडाणा जिल्ह्यात किडनी रोगाने‎ मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. मला‎ अनेकदा याविषयी वर्तमानपत्रात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाचायला मिळायचे. परंतु नेमके मृत्यूचे‎ कारण काय, असा प्रश्न होताच त्यासाठी‎ मी खारपाणपट्यात स्वता फिरलो. माती‎ आणि पाणी परीक्षण केले. अमेरिकेच्या‎ लॅबचेही यासाठी सहाय्य घेतले.

यासाठी‎ लाखोंचा खर्च आला,तोही केला. परंतु‎ स्फुरद ची मात्रा व त्यातून होणारे‎ किडनीचे नुकसान पुढे आले. यावर‎ संशोधन करून उपाय शोधता आले. हे‎ प्रमाण आता ०.३० टक्क्यावर आणण्यात‎ यश आले आहे. संशोधन कोणतेही असू‎ द्या, त्याची सुरुवात कुटुंबातून होते.‎ मुलांना घेऊन अभ्यास करणारे पालक‎ खरे तर मुलांचे नुकसान करतात. त्याला‎ त्यांचे काम करू दिले तर तो सक्षमपणे‎ उभा राहतो, असे सांगितले.

त्यानंतर‎ संस्था अध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड यांनी‎ आपले विचार व्यक्त करताना पद्मश्री डॉ.‎ बावस्करांनी लाखो लोकांचे प्राण‎ वाचवणारे संशोधन पुढे आणले. त्यांचे हे‎ कार्य एखाद्या प्रेषिता सारखेच असल्याचे‎ ते म्हणाले. यावेळी त्यांनी संस्थेच्या‎ वतीने त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान‎ केला. संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे‎ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची‎ भूमिका विषद केली. पद्मश्री बावस्करांचे‎ कार्य मानव मुक्तीचे असल्याचे शिवाजी‎ तायडे म्हणाले. हभप विकास बाहेकर,‎ आहार तज्ञ डॉ. हिंगणे, हभप भिकाजी‎ तायडे, यांनी आपले विचार व्यक्त केले.‎ कार्यक्रमाला व्यवस्थापक मनोज तायडे,‎ डॉ. शरद काळे, विलास भगत व‎ कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...