आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:260 क्विंटल कापसाच्या करणार गाठी‎ ; सरकारच्या प्रकल्पात दोनवाडा येथील शेतकऱ्यांचा सहभाग‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा विविध कारणांमुळे कापसाला‎ प्रतिक्विंटल अपेक्षेपेक्षा कमी भाव‎ मिळत आहे. त्यामुळे अनेक‎ शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे.‎ काही कापूस उत्पादक मात्र कमी‎ भावावर तोडगा म्हणून सरकारच्या‎ योजनेचा आधार घेत आहेत. अकोला‎ तालुक्यात दोनवाडा येथील काही‎ शेतकऱ्यांनी शासकीय प्रकल्पात‎ सहभाग घेत कापसाच्या गाठी‎ बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.‎ पहिल्या दोन ते तीन वेचणीचा २६०‎ क्विंटल कापूस प्रकल्पासाठी दिला‎ स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत‎ जिल्ह्यातील दोनवाडा येथील‎‎‎‎‎‎‎ अहिल्यादेवी होळकर कापूस उत्पादक‎ गटामार्फत उत्पादित कापूस जिनिंग‎ आणि प्रेसिंग करण्यासाठी पाठवण्यात‎ आला. कापसावर प्रक्रिया करून‎ त्याच्या गाठी तयार केल्या जाणार‎ आहेत. जिल्ह्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प‎ राबवला जात आहे.

या प्रकल्पातून‎ विविध भागातील शेतकऱ्यांनी कापूस‎ उत्पादनसाठी सहभाग घेतला.‎ दोनवाडा भागातील अहिल्यादेवी‎ होळकर गटाने उत्पादित केलेला‎‎‎‎‎‎‎ कापूस आपातापा येथील जय गुरू‎ जिनिंग प्रेसिंग येथे गाठी तयार‎ करण्यासाठी आणण्यात आला.‎ महाकॉट, पियायू व कृषी विभागाच्या‎ सहकार्याने व्यापारी तत्त्वावर कापसाचे‎ गाठींमध्ये मूल्यवर्धन करून थेट लाभ‎ हस्तांतरित करत शेतकऱ्यांना याचा‎ लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने हा‎ प्रकल्प सुरू केला. दोनवाडा येथील‎ शेतकऱ्यांनी सहा शेतकऱ्यांनी नुकतेच‎ सुमारे २६० क्विंटल कापूस आणला.‎ यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा)‎ आरिफ शाह, उपविभागीय कृषी‎ अधिकारी के. बी. खोत, तालुका कृषी‎ अधिकारी शशिकिरण जांभरूणकर,‎ जिल्हा नोडल अधिकारी मनशी‎ मनभेकर, मंडळ कृषी अधिकारी‎ संदीप संखे, प्रदीप राऊत, सिनिअर‎ ऑटर ग्रेटर महाकोट एम. बनचरे, कृषी‎ पर्यवेक्षक सी. पी. नावकार, कृषी‎ सहायक धर्मेंद्र राठोड, संतोष मुळे,‎ संजय सावदेकर, अनिल वानखेडे,‎ नीतेश घाटोळ, प्रणीत बंड आणि‎ सरपंच श्रीकृष्ण पाटील झटाले,‎ गटप्रवर्तक गोपालभाऊ बचे, शेतकरी‎ विठ्ठल झटाले हरिदास बचे, भरत‎ काळमेघ, विशाल पवार, उमेश बचे,‎ शुभम जाधव आदी उपस्थित होते.‎

बाजारमूल्यापेक्षा अधिक‎ दर मिळेल‎ शेतकऱ्यांनी बाजारातील लांब‎ धाग्याच्या कापूस वाणांची लागवड‎ करत उत्पादन घेतले. या‎ शेतकऱ्यांनी पहिल्या दोन ते तीन‎ वेचणीचा कापूस दिला.‎ प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २६०‎ क्विंटल कापूस आला आहे.‎ आणखी काही शेतकरी येत्या‎ काळात कापूस देणार आहेत.‎ प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या गाठीची‎ विक्री केली जाईल. शेतकऱ्यांना‎ बाजार मूल्यापेक्षा अधिक दर यामुळे‎ मिळू शकेल.‎ - संतोष मुळे, कृषी सहायक, दोनवाडा‎

बातम्या आणखी आहेत...