आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका पाणीपुरवठा विभागाने चालु आर्थिक वर्षात ७ कोटी ७० लाख ३१ हजार १७० रुपयांची पाणीपट्टीची वसुली केली. मात्र अद्यापही कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी नागिरकांकडे थकीत आहे. महापालिकेचे मालमत्ता करानंतर पाणीपट्टी हे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र पाणीपट्टी वसुलीकडे गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. पाणीपट्टी देयक वितरणाचे काम महापालिका कर्मचारी करतात. यासाठी नळाचे रिडींग घेणे, रिडिंग देयके तयार करणाऱ्या कंपनीला देणे आणि देयके घेवून वितरीत करणे, अशी जबाबदारी व्हॉल्वमन, फिटर यांना करावी लागते. दरम्यान देयके तयार करणाऱ्या कंपनीचे देयक थकल्याने कंपनीने देयक तयार करण्याचे काम बंद केले होते. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीची देयकेच मिळाली नाहीत. त्यामुळे पाणीपट्टी वसुली ठप्प झाली होती.
गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा पाणीपट्टी देयक तयार करण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पाणीपट्टीची वसुली मंदावली. ४२ हजार नळांना मीटर महापालिका क्षेत्रात एकूण ७१ हजार ८०० वैध नळजोडण्या आहेत. यापैकी ४२ हजार ४३३ नळधारकांनी नळांना मीटर लावले आहे. तर २९ हजार ३६७ नळांना अद्यापही मीटर लावलेले नाही. तसेच अद्यापही हजारो नळजोडण्या अवैध आहेत.
अद्याप ७ कोटी पाणीपट्टी थकीत महापालिकेला वर्षाकाठी १२ ते १५ कोटी रुपये पाणीपट्टी अपेक्षित आहे. आतापर्यंत ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुल झाली असली तरी अद्याप महापालिकेला ७ कोटी रुपये थकीत पाणीपट्टीची वसुली करावी लागणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.