आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:श्रीकृष्णांच्या जयघोषात सावदा‎ येथून पदयात्रेने केले प्रस्थान‎ ; जाळीचा देव येथे 4 रोजी पोहोचणार‎

सावदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे सावदा‎ येथून बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा‎ देव या महानुभाव संप्रदायाचे‎ तीर्थक्षेत्रावर, पौर्णिमेनिम्मित भाविकांनी‎ पदयात्रा काढली. बुधवारी सकाळी ७‎ वाजता पदयात्रा मार्गस्थ झाली. श्री कृष्ण‎ मंदिराचे गादीपती आचार्य श्री सुरेशराज‎ मानेकर मोठे बाबा आणि वरणगाव‎ येथील महंत राजकुमार दादा यांचे‎ नेतृत्वाखाली ही पदयात्रा उत्साहात‎ रवाना झाली.‎ बुधवारी सकाळी श्रीकृष्ण मंदिरात‎ पहाट आरती करून या पदयात्रेस प्रारंभ‎ झाला. पदयात्रेत सुमारे दीडशे महिला,‎ पुरुष, भाविक सहभागी झाले आहेत.‎ सकाळी श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे पूजन‎ अनिल महाजन आणि विद्या महाजन‎ यांनी केले. दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाला. ही पदयात्रा चांगदेव, हरताळा,‎ बोदवड, बेटावद सावळदबारा इत्यादी‎ तीर्थक्षेत्रावर मुक्काम करून बुलडाणा‎ जिल्ह्यातील जाळीचा देव येथे पोहोचेल.‎ सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास‎ करून ४ फेब्रुवारीला पदयात्रा जाळीचा‎ देव येथे पोहोचेल. ५ फेब्रुवारीला यात्रा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महोत्सवात देवाचे दर्शन घेऊन तेथेच‎ मान्यवर संतांच्या उपस्थितीत पदयात्रेचा‎ समारोप होईल. या पदयात्रेसाठी सावदा‎ परिसरातील कोचूर, मोहराळा,‎ वरणगाव, कर्की, वेल्हाळा येथील‎ भाविक सहभागी झाले आहेत. पदयात्रेचे‎ ठिकठिकाणी स्वागत झाले.‎

आचार्य सुरेशराज मानेकर मोठे बाबा‎ यांच्या उपस्थितीत पदयात्रा गेली.‎ दररोज २८ किमी प्रवास‎ सावदा ते जाळीचा देव हे अंतर १५०‎ किलोमीटर असून दररोज २५ ते २८‎ किलोमीटरचा प्रवास केला जाणार‎ आहे. पाहिला मुक्काम चांगदेव, दुसरा‎ मुक्काम बोदवड, तिसरा मुक्काम‎ कापूसवाडी, चौथा मुक्काम नांदा तांडा,‎ पाचवा मुक्काम सावळद बारामार्गे‎ जाळीचा देव येथे असेल. दि. ५ रोजी‎ पदयात्रेचा समारोप जाळीचा देव येथे‎ ‎केला जाणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...