आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले मराठी साहित्य समृद्ध आहे. साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन व श्रवण केल्याने जीवनाला चांगले वळण लागते. लेखनाची प्रेरणा देखील मिळते. नवीन पिढीला याची प्रकर्षाने गरज आहे. या जाणिवेतून प्रतिभा साहित्य संघाच्या शाखेची स्थापना व वऱ्हाडी कविसंमेलनाचे सातेगाव येथील ईश्वर चौकात रविवारी (दि.२) आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संघाची २५ सदस्यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली. कविसंमेलनात संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते यांच्या शेती माती आणि सामाजिक व व्यंगात्मक कवितांच्या बहारदार सादरीकरणाने कविसंमेलन रात्री उशिरापर्यंत रंगले.
यासोबतच संघाचे शाखाध्यक्ष बाबाराव पाथरकर, सुधीर खोडे, हरिणारायण ढोले, संदीप गावंडे, विशाल कुलट, अनंत कुलट यांनीही बहारदार कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन विठ्ठल कुलट यांनी केले. कार्यक्रमाला राम मरकाळे, रामदास गावंडे, प्रतिभा साहित्य संघाचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण काकड, शाखाध्यक्ष बाबाराव पाथरकर, उपाध्यक्ष चंद्रकिशोर काळे, सदस्य गजानन काळे, अमोल दाभाडे, ज्ञानेश्वर गावंडे, सनी शेळके, मोहन पळसकर, छोटुभाऊ मानकर, पुरुषोत्तम काळे, अंकुश मानकर, उज्वल ठाकरे, श्रीधर तिवाने, राजूभाऊ गिरनाळे, विठ्ठल ढोले, किशोर गावंडे, सुधीर काळे, राम देशमुख, विलास पातोंड, रवींद्र खवणे, कपिल वानखडे, अ. एजाज अ. अयास, छोटुभाऊ देशमुख आदी उपस्थित होते. आभार अमरदीप काळे यांनी मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.