आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरमध्ये 18 वर्षाची पूर्ण‎ झाल्यानंतर होणार होते लग्न‎:साखरपुडा झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्याने तिला पळवून नेले‎

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरपुडा झाल्यानंतर‎ लग्नाची वाट न पाहता आपल्या‎ उपवधूला पळवून नेणाऱ्या उपवराविरूद्ध‎ अकोट फैल पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुलगी‎ ही अल्पवयीन आहे. नोव्हेंबरमध्ये १८‎ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न ठरले‎ होते.‎ अकोट फैलातील एका अल्पवयीन‎ मुलीसोबत अमरावती येथील‎ मोचीपुऱ्यातील एका युवकाची सोयरीक‎ जुळली होती. लग्न करण्यासाठी ती १८‎ वर्षाची असणे आवश्यक असल्याने‎ आधी साखरपुडा उरकून घेऊ व नंतर ती‎ १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर लग्न करू‎ असे सामंजस्याने दोघांच्या‎ कुटुंबियांकडून ठरले होते. त्यानुसार २७‎ जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला‎ होता. तेव्हापासून मुलीचे व युवकाचे‎ मोबाइलवरून बोलणे सुरू झाले.

२५‎ मार्चला मुलीची प्रकृती चांगली नव्हती.‎ त्या बहाण्याने युवक हा २८ मार्चला‎ तिच्या घरी दुपारी दोन वाजताच्या‎ सुमारास आला होता. चहापाण्यानंतर‎ मुलीची आई काम करीत असलेल्या‎ हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त निघून गेली‎ व दोन तासानंतर परत आली असता‎ मुलगी आणि होणारा जावई दोघेही घरी‎ नव्हते. ते शहरात फिरायला गेले‎ असतील म्हणून सायंकाळपर्यंत त्यांची‎ वाट पाहिली. मात्र ते घरी आले नाही‎ आणि त्यांचा मोबाइलही बंद असल्याने‎ त्यांची शोधाशोध सुरू केली असता‎ रात्री युवकाच्या बडनेरा येथील बहिणीने‎ मुलीच्या आईला दोघेही आपल्याकडे‎ असल्याचे सांगितले आणि फोन बंद‎ केला.

काळजीपोटी मुलीची आई बडनेरा‎ येथे गेली असता तिला युवकाच्या‎ बहिणीचे घर न सापडल्याने ती‎ अमरावती येथील युवकाच्या घरी गेली‎ असता युवकाच्या आईने दोघेही घरी‎ आले नसल्याचे सांगितले. अखेर‎ मुलीच्या आईने अकोट फैल पोलिस‎ ठाणे गाठून तक्रार दिली असता‎ पोलिसांनी युवकाविरूद्ध अपहरणाचा‎ गुन्हा दाखल केला आहे.‎