आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्नातून परत येणाऱ्या वाहनाला ट्रकची‎ धडक ; 4 वऱ्हाडी गंभीर‎, हातगाव जामठी फाट्याजवळील घटना

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारव्हा येथून लग्न‎ वऱ्हाड घेऊन परत येणाऱ्या उभ्या‎ वाहनाला मागून ट्रक (चेचीस)ने‎ धडक दिल्याने ४ वऱ्हाडी गंभीर‎ जखमी झाले. ही घटना शनिवारी ६ मे‎ रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान‎ हातगाव जामठी फाट्याजवळ घडली.‎

दारव्हा येथून एमएच २६ एके ००६२‎ या मॅक्सीमो गाडीने वऱ्हाड घेऊन येत‎ असताना हे वाहन जामठी (हातगाव)‎ फाट्या दरम्यान बंद पडले. या वेळी‎ मागून येणाऱ्या ट्रक चेसीस क्रमांक‎ जेएच ०५ ए ८४३८ (तात्पुरता क्रमांक )‎ ने बंद पडलेल्या वऱ्हाडी वाहनाला‎ धडक दिली.

या धडकेत बंद‎ वाहनातील नरेश दिवाकर जाधव‎ (३२), कमला दीपक जाधव (५०),‎ श्याम राजेंद्र गायकवाड (२२), निलेश‎ गोरख वानखडे (२७) सर्व राहणार‎ दाळंबी, स्वज्वल सुधाकर जाधव‎ (२१), पियुष सुधाकर जाधव (२०),‎ भोजराज नामदेव जाधव (५२),‎ संगीता गजानन जाधव (४१), कुसूम‎ सुधाकर जाधव (६५), माधुरी नामदेव‎ गायकवाड (५२), सुभाष सदाशिव‎ गायकवाड (६९), अरविंद भानुदास‎ तायडे (२४) राहणार अमरावती,‎ परतवाडा, वरुड हे जखमी झाले.‎ यापैकी ४ प्रवासी गंभीर जखमी झाले‎ आहेत.

याची माहिती कळताच १२‎ जखमी अपघातग्रस्तांना संत गजानन‎ महाराज संस्था आमदार हरीष पिंपळे‎ द्वारा संचालित रुग्ण वाहीकेतून‎ लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.‎ त्या पैकी ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर‎ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी‎ अकोला येथे पाठवले . यासंदर्भात‎ ग्रामीण पोलिसांनी ट्रक चेसीच‎ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.‎ अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक‎ पोलिस उपनिरीक्षक हिंमत ठाकरे, हेड‎ कॉन्स्टेबल गजानन थाटे करीत आहेत.‎