आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्जन्य:एप्रिलमध्ये ‘अवकाळी’ने गिळली‎ 14 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके‎, जिल्ह्यात झालेल्या पाऊस, गारपिटीचा फळबागांना माेठा फटका

अकाेला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात भर‎ उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी‎ पाऊस व गारपिटीमुळे 13 हजार‎ 833 हेक्टर क्षेत्रातवरील पिकांचे‎ नुकसान झाले. एक वेळा झालेल्या‎ नुकसानाचा अंतिम पाहणी‎ अहवाल तयार झाला असून,‎ उर्वरित दाेन वेळा झालेल्या‎ नुकसानाची प्राथमिक माहिती‎ संकलित करण्यात आली आहे.‎

संपूर्ण महिन्याचा अंतिम अहवाल‎ तयार झाल्यानंतर शासनाकडे‎ मदतीची मागणी करण्यात येणार‎ आहे.‎ जिल्ह्यात गत वर्षी जून ते सप्टेंबर‎ व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या ‎ ‎ पावसाचा पिकांना फटका बसला ‎ ‎ हाेता. खरीपमध्ये झालेले नुकसान ‎ ‎ रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या ‎आशेने शेतकरी कामाला लागले.‎ मात्र मार्च महिन्यानंतर एप्रिल‎ महिन्यातही अवकाळी पाऊस व‎ गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह‎ िवजांच्या कडकडाटात जाेरदार‎ पाऊस झाला.

शेतमालाचे उत्पादन‎ प्रचंड घटल्याने शेतकरी हवालदिल‎ झाले आहेत. लिंबू, आंबा, संत्री,‎ गहू, भाजीपाला, कांदा पिकाचे‎ नुकसान झाले हाेते.‎ बाळापूर तालुक्यात २६ एप्रिलला झालेल्या पावसामुळे शेतात चिखल तयार झाला हाेता.‎ जिल्ह्यातील बाधित गावे ७०७‎ नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५,३७१‎ एकूण बाधित क्षेत्र ९,२६८‎ पातूर व बार्शीटाकाळी तालुक्यात २६ ते २७‎ एप्रिलदरम्यान पावसामुळे ३ हजार ६६५ हेक्टर वरील‎ पिकांचे नुकसान झाले.

या पावसाचा फटका ५६‎ गावांतील २ हजार ३४५ शेतकऱ्यांना बसला आहे.‎ अकाेट, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यात २८‎ ते ३० दरम्यान अंदाजे ६९० शेतकऱ्यांच्या जवळपास‎ ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. उपराेक्त‎ दाेन्ही नुकसानाचे अंतिम पंचनामे सुरू आहेत.‎

काेणत्या पिकांना‎ बसला फटका?‎ अकोला, बार्शीटाकळी,‎ मूर्तिजापूर, बाळापूर व पातूर‎ तालुक्यातील शेतकऱ्यांचे‎ अवकाळी पाऊस व‎ गारपीटमुळे नुकसान झाले‎ हाेते.पपई, केळी, लिंबू, आंबा,‎ संत्रा, डाळिंब ही फळ पिके‎ बाधित झाली. त्यासोबतच गहू,‎ ज्वारी, हरबरा, भुईमुग,‎ भाजीपाला, कांदा, मूग, मका,‎ टरबुज व इतर बागायती‎ पिकांचे नुकसान झाले.‎

एप्रिलमध्ये झालेले नुकसान‎

  • जिल्ह्यातील बाधित गावे ७०७‎
  • नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५,३७१‎
  • एकूण बाधित क्षेत्र ९,२६८‎

गारपिटीने असे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालात‎ नमूद हाेते. हे पंचनामे कृषी, महसूल, जि.प. यंत्रणेने केले.‎

मार्चमध्ये झालेले‎ नुकसान असे‎

तेल्हारा तालुक्यातात‎ ६ व ७ मार्च राेजी २८६‎ शेतकऱ्यांच्या २०८‎ हेक्टर क्षेत्रावरील‎ पिकांचे नुकसान झाले.‎ भरपाईसाठी ३५ लाख‎ ३८ हजार ८९० रुपयांची‎ गरज आहे.‎ बार्शीटाकळी,‎ तेल्हारा व पातूर‎ तालुक्यात १५ ते १९‎ मार्च दरम्यान ६३५‎ शेतकऱ्यांच्या २ हजार‎ ३८५ हेक्टर क्षेत्रावरील‎ पिकांनी हानी झाली.‎ बार्शीटाकळी व पातूर‎ तालुक्यात ३१ मार्च‎ राेजी ६३५ शेतकऱ्यांचे‎ ४३० हेक्टर क्षेत्रावरील‎ पीके जमीदाेस्त झाली.‎ नुकसान भरपाई‎ देण्यासाठी ७८ लाख‎ ४० हजार ९९५‎ रुपयांची गरज आहे.‎