आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:उन्हाच्या वाढत्या चटक्याने नागरिक हैराण, उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करावे?

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला‎ दोन दिवसापासून तापमानात वाढ झाली‎ आहे. या वाढत्या तापमानाचा फटका‎ कोणालाही बसु शकतो. ही बाब लक्षात‎ घेवून नागरिकांनी उष्‍माघात टाळण्‍यासाठी‎ प्रतिबंधात्‍म उपाय योजना कराव्यात, असे‎ आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय‎ आरोग्‍य अधिकारी डॉ.अनुप चौधरी यांनी‎ केले आहे.‎

वाढत्या तापमानात अधिक फिरल्यास‎ उष्‍माघात होण्याची शक्यता नाकारता येत‎ नाही. उन्‍हाळ्यामध्‍ये शेतावर अथवा इतर‎ मजुरीचे कामे फार वेळ करणे,‎ कारखान्याच्‍या बॉयलर रूममध्ये काम‎ करणे, काच कारखान्यातील कामे करणे,‎ जास्‍त तापमानाच्‍या खोलीमध्‍ये काम करणे,‎ घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्‍यक्ष‎ उष्‍णतेशी अथवा वाढत्‍या तापमानातील‎ परिस्थितीत सतत संबंध आल्‍याने उष्‍माघात‎ होतो.

उष्माघातापासून वाचण्यासाठी हे करा

थकवा येणे, ताप येणे, त्‍वचा कोरडी‎ पडणे, भूक न लागणे, चक्‍कर येणे,‎ निरूत्‍साही होणे, डोकेदुखी, रक्‍तदाब‎ वाढणे, मानसिक व शारीरीक अस्‍वस्‍थतता,‎ बेशुद्धावस्था आदी उष्माघाताची लक्षणे‎ आहेत. यासाठी

1] पुरेसे पाणी प्या, तहान‎ लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या‎ फरकाने पाणी प्यावे.

2] घराबाहेर पडताना डोके‎ झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर‎ करावा, दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान‎ घराबाहेर जाणे टाळणे, सूर्यप्रकाशापासून‎ वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा‎ वापर करावा

3] हलकी, पातळ व सच्छिद्र‎ सुती कपडे वापरावेत, प्रवासात पिण्याचे‎ पाणी सोबत ठेवाणे, उन्हात काम करीत‎ असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या‎ कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात‎ यावा.

4] शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत‎ असल्यास ओआरएस घेणे किंवा घरी‎ बनलेली लस्सी, कैरीचे पन्‍हे, लिंबू-पाणी,‎ ताक इत्यादीचा वापर नियमित करावा,‎ अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम‎ आदी उन्हाचा फटका बसण्याची चिन्हे‎ ओळखावीत व चक्कर येत असल्यास‎ तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.‎

रुग्णांची काळजी घ्या

दरम्यान पशूंच्या बचावासाठी गुरांना‎ छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी‎ पिण्यास द्यावे, उष्पाघाताची लक्षणे दिसतास‎ रूग्‍णास हवेशीर खोलीत ठेवावे, तिथे पंखे,‎ कुलर ठेवावेत शक्‍य असल्‍यास‎ वातानुकुलीत खोलीत ठेवावे, रूग्‍णाच्या‎ शरीराचे तापमान खाली आणण्‍याच्या दृष्‍टीने‎ प्रयत्‍न करावे.

त्याला बर्फाच्या पाण्‍याने‎ आंघोळ घालावी,त्याच्या कपाळावर थंड‎ पाण्‍याच्‍या पट्ट्या ठेवाव्‍यात, आईस पॅक‎ लावावेत, रूग्‍णाची प्रकृती गंभीर झाल्‍यास‎ दवाखान्‍यात उपचारार्थ दाखल करावे, असे‎ आवाहन डॉ.अनुप चौधरी यांनी केले आहे.‎