आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा‎:गांधीग्राम येथील पर्यायी‎ पूल, राज्यमार्ग सुरू करा‎

अकाेला‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधी ग्राम येथील पर्यायी पूल व‎ गाेपालखेड राज्यमार्ग सुरू करा;‎ अन्यथा कार्यालयांना कुलूप ठोकण्यात‎ येईल, असा इशारा सर्वपक्षीय संघर्ष‎ समितीने बुधवारी सार्वजनिक‎ बांधकाम विभाग जागतिक बंॅक‎ प्रकल्प) व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग‎ प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दिला.‎ सदस्यांनी अभियंत्यांशी केली चर्चा‎ करून निवेदनही सादर केले.‎ गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील‎ ब्रिटिशकालीन पुलाला १५० वर्षापेक्षा‎ जादा काळ झाला आहे. मात्र या‎ पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाची परिस्थिती‎ बिकट झाली आहे. एखादी मोठी घटना‎ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.‎ त्यामुळे पुलावरून वाहतूक बंद आहे.‎ पर्यायी पुलाचे-रस्त्याचे बांधकाम सुरू‎ आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू‎ आहे. त्यामुळे बुधवारी सर्वपक्षीय संघर्ष‎ समितीने आधी सार्वजनिक बांधकाम‎ विभागाचे ( जागतिक ब‌ँक प्रकल्प)‎ कार्यकारी अभियंता प्रवीण सरनायक व‎ नंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग‎ प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता‎ अडचुले यांची भेट घेत निवेदन दिले.‎

यावेळी समितीचे राजू मंगळे, गाेपाल‎ दातकर, मनाेहर शेळके, नितीन ताथाेड,‎ शिवा माेहाेड, शरद प्रभाकर झांबरे,दीप‎ इंघळे, दिलीप लेलेकर, गाेपाल म्हैसने,‎ मुश्ताक शहा, दिनेश वाघमारे, अमरल‎ माेराेदे, भीमराव पळसपगार आदी हाेते.‎ २५ पेक्षा जास्त गावे प्रभावित‎ अकाेला-अकाेट रोडवरील गांधी ग्राम‎ येथील पूल बंद असल्याने २५ पेक्षा‎ जास्त गावे प्रभावित झाली आहेत.‎ त्यामुळे या गावांतील शेतकरी,‎ शेतमजूर, िवद्यार्थु, व्यावसाियक, वीट‎ उत्पादक यांच्यासह ग्रामस्थांनी‎ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎ दिली. यात किनखेड, काटी-पाटी,‎ राेहणा, दहिहंडा, सुकळी, रेल-धारेल,‎ धामणा, कराेडी आदींचा समावेश‎ हाेता.‎

काय आहे निवेदनात?‎‎
गांधीग्राम येथील पर्यायी पूल‎ ,गेपालखेड दहिहंडा फाटा रस्ता,‎ अकाेला-अकाेट राेडबाबत १५ ते २२‎ नाेव्हेंबर येथे धरणे आंदाेलन केल्याचे‎ सर्वपक्षीय संघर्ष समितीने निवेदनात‎ नमूद केले. दाेन महिन्यात मार्ग सुरू‎ हाेईल, असे आवश्यक दिले हाेते. मात्र‎ सध्या तीन महिने उलटल्यानंतरही काम‎ पूर्ण झालेले नाही.‎ व्यापारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रचंड‎ हाल हाेत आहेत. मात्र प्रशासन गंभीर‎ नसून, पर्यायी मार्गासाठी ४ काेटी रुपये‎ मंजूर झाले आहे. मात्र हे काम निकृष्ट‎ दर्जाचे आहे. त्यामुळे यावर ७ दिवसात‎ ताेडगा न निघाल्यास संबंधित‎ कार्यालयाला ताला ठोकण्यात येईल,‎ असा इशारा निवेदनात दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...