आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्रशासनाचा आयाेजकांना आदेश:शिव महापुराण कथा मंडप, विद्युत व्यवस्थेचे‎ ऑडिट करा; अन्नासह पाण्याचे नमुने तपासा‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसपूर येथे आयोजित शिव महापुराण ‎ ‎कथा कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांच्या ‎ ‎ संख्येचा आयोजकांनी दिलेला अंदाज ‎ ‎ पाहता आयोजकांनी कथा स्थळी‎ सुरक्षा, स्वच्छता उपाययोजना कराव्या, ‎ असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने ‎ बुधवारी आयोजकांना दिले.‎

कथा मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडिट, ‎मंडपअंतर्गत विद्युत व्यवस्थेचेही‎ सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट करावे, सभा‎ मंडप, स्वयंपाकाच्या जागी अग्निशमन‎ संयंत्रे ठेवावीत, अन्न, पाण्याचे नमुने‎ तपासावे, अशा सूचनाही दिल्या.‎ शिवमहापुराण कथा आयोजनासंदर्भात‎ जिल्हा प्रशासनाने नियोजन भवनात‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ बैठकीचे आयोजन केले होते.‎

आयोजकांकडून ५ मेपासून होत‎ असलेल्या कथा कार्यक्रमाच्या‎ तयारीची माहिती बैठकीत सांगीतली.‎ कथेस जमणाऱ्या भाविकांच्या‎ आरोग्य, जेवण, पाणी, स्वच्छता,‎ ‎अग्निशमन, विद्युत यंत्रणा, मंडप‎ उभारणी, वाहतूक व्यवस्थेबाबत‎ माहिती सादर केली. या बैठकीस‎ जिल्हाधिकारी नीमा अरोरा, पोलिस‎ अधीक्षक संदीप घुगे, निवासी‎ उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त‎ अन्न औषध प्रशासन सागर तेरकर,‎ म्हैसपूरच्या सरपंच मीना इंगळे,‎ ग्रामसेवक आर. बी. अटकर,‎ उपविभागीय पोलिस अधिकारी‎ संतोष राऊत, सार्वजनिक बांधकाम‎ विभागाचे उपविभागीय अभियंता‎ दिनकर नागे, राष्ट्रीय महामार्ग‎ विभागाचे कार्यकारी अभियंता‎ राकेश जवादे, शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ.‎ मीनाक्षी गजभिये, तहसीलदार‎ सुनिल पाटील यांच्यासह विविध‎ विभागांचे अधिकारी उपस्थित होते.‎ आयोजकांतर्फे विजय दुबे व रुपेश‎ चौरसिया यांच्यासह त्यांचे अन्य‎ सहकारी उपस्थित होते.‎

अशी राहील सुरक्षा

शिवमहापुराण कथेसाठी जिल्हा‎ प्रशासनातर्फे पोलिस यंत्रणा‎ सुरक्षेच्या व वाहतूक नियमनाच्या‎ दृष्टीने तैनात राहणार अाहेत. यात‎ ३०० ते ३५० पोलिस (महिला-‎ पुरुष), अधिकारी, २५० होमगार्ड‎ (महिला- पुरुष) तैनात असतील,‎ असे पोलिस अधीक्षक घुगे यांनी‎ सांगितले. या केल्या सूचना‎ अायाेजकांना प्रशासनाकडून‎ महत्त्वाच्या सूचना करण्यात‎ आल्या.

  • सभा स्थळी सीसीटीव्ही‎ कॅमेरे बसवून एक नियंत्रण कक्ष‎ तयार करावा.
  • भाविकांसाठी‎ येण्या- जाण्याचे, विविध‎ सुविधांकडे जाण्याचे दिशादर्शक‎ फलक लावावेत.
  • पिण्याच्या‎ पाण्याची सोय ठिकठिकाणी‎ असावी.‎

अशी घ्या दक्षता

  • कथास्थळी‎ तयार होणारे अन्नपदार्थांचे नमुने‎ अन्न औषध प्रशासन विभागाचे‎ अधिकारी तपासणार आहेत.‎
  • अन्न औषध प्रशासन विभागाचे‎ सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी‎ सूचना केली की, अन्न शिजवून‎ झाल्यानंतर ते कमीत कमी‎ कालावधीत लोकांना वितरीत‎ करावे. अन्न जास्त काळ ठेवू नये.‎ दुग्धजन्य पदार्थांचा भोजनात‎ समावेश करु नये.
  • भाविकांची‎ गर्दी एकाच ठिकाणी होणार नाही,‎ याची दक्षता घेण्यासाठी प्रसाद वा‎ अन्य काहीही वस्तू वाटप आदींचे‎ आयोजन करु नये. जेवणाचेही‎ स्टॉल्स अनेक ठिकाणी लावावे,‎ जेणे करुन जेवणाच्या ठिकाणी‎ लोकांची गर्दी होणार नाही.‎

समन्वयासाठी राहणार कक्ष‎

कथा मंडप, स्वयंपाकाची जागा इ. ठिकाणी अग्निशमन संयंत्रे ठेवावी, असे‎ जिल्हा प्रशासनाने सांगीतले. अग्निशमन संयंत्र चालवण्याबाबत आपत्ती‎ व्यवस्थापन दलाकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाईल. कचऱ्याच्या‎ विल्हेवाटीसाठी स्वयंसेवकांची व्यवस्था असावी. प्रशासनातर्फे डॉक्टरांसह‎ आरोग्य पथक, चार रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, इ. उपाययोजना करण्यात‎ येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले . आयोजक ‎, प्रशासनात समन्वय‎ राखण्यासाठी मध्यवर्ती कक्ष कार्यान्वित करावा. आपत्ती व्यवस्थापन दलाची‎ दोन पथके कथास्थळी तैनात असतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.‎