आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदाससंघातील िवकासकामांना िवराेध असून, ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणीपुरवठा याेजनेला स्थगिती देत पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले,’ अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार िनतीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. राजकरण करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या िनषेधार्थ मंगळवारी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर आपणउपाेषण करणार असून, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ५ हजार ग्रामस्थ आंदाेलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.
बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या व शिवसेना (उद्धव ठाकरे) आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेला शिंदे- फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या याेजनेला वान प्रकल्पातून पाणीपुरवठा हाेणार असून, पाणी देण्याला तेल्हारा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी िवराेध केला आहे. दरम्यान बाळापूरचे आमदार देशमुख यांनी रविवारी १२ मार्चला पत्रकार परिषदेत भाजपवर िनशाणा साधला. वानमधून शेगाव, जळगाव जामाेद येथेही पाणीपुरवठा हाेताे.
मात्र त्या िठकाणी भाजपचे आमदार असून, बाळापूर येथे शिवसेनेचे आमदार असल्यानेच भाजपचे आमदार िवराेध करीत आहेत. पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाणीटंचाई िनवारण्यासाठी बैठक घेणे आवश्यक हाेते. मात्र हे न करता त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणीपुरवठा याेजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवले आहे. स्वत:ला िहंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकराला ग्रामस्थ हे िहंदू दिसत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला. पत्रकार परिषेदला माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश िमश्रा, विकास पागृत, उमेश जाधव आदी उपस्थित हाेते.
न्यायप्रविष्ट असतानाही स्थगिती : ६० गावे पाणीपुरवठा याेजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती िदली. याेजनेची किंमत २१९ काेटी रुपये असून, प्रत्यक्ष याेजनेवर १९२ काेटी रुपये खर्च हाेणार आहेत.
त्यापैकी १०८ काेटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ काेटीचे देयकही अदा करण्यात आले आहे, असे असनाताही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याेजनेला स्थगिती देत स्वत:ची बाैद्धिक दिवाळखाेरीच जाहीर केली, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली. ...तर सरकारने दखल घ्यावी प्रत्यक्ष वान प्रकल्पासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित झालेली नाही, असे आमदार देशमुख म्हणाले. मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली चार-पाच भाजप कार्यकर्त्यांनी पाणी आरक्षणाला िवराेध केला आणि अकाेटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्र दिल्याने याेजनेला स्थगिती देण्यात आली. आता मंगळवारी शेकडाे ग्रामस्थांकडून हाेणाऱ्या आंदाेलनाची पाण्यावरूनही राजकारण करणारे शिंदे-फडणवीस सरकार दखल घेईल काय, असा सवाल आमदार देशमुख यांनी केला.
असे आहे आरक्षण : पाणीपुरवठा हाेणाऱ्या वान प्रकल्पाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. सिंचनासाठी ७८.५७३ दलघमी पाणी आहे. पिण्यासाठी १.४०४ तर बाप्पीभवन म्हणून ४.४५७० दलघमी पाणी जाते. अकाेट शहर पाणीपुरवठा याेजना : ८.६६ दलघमी तेल्हारा शहर पाणीपुरवठा याेजना : ३.१६ दलघमी जळगाव जामाेद पाणीपुरवठा याेजना : ४.०२ दलघमी ८४ खेडी पाणीपुरवठा याेजना : ४.२३९ दलघमी शेगाव शहर पाणीपुरवठा याेजना : ५.६२ दलघमी १४० गावे जळगाव जामाेद पाणीपुरवठा याेजना : ८.४५४ दलघमी तेल्हारा-अकाेट १५९ पाणीपुरवठा याेजना (प्रस्तावित): ३.७५३ दलघमी ८)अकाेला शहर अमृत पाणीपुरवठा याेजना (सध्या स्थगिती): २४ दलघमी ९) बाळापूर-अकाेला ६९ गावे पाणीपुरवठा याेजना : ३.३५ दघलमी १०) शेगाव ३० गावे पाणीपुरवठा याेजना (प्रस्तावित): ४.७३३ दलघमी
आगामी काळात शिवसेना यावरही आंदाेलन करेल
वान धरणातून महापालिकेच्या पाणीपुरवठा याेजनेसाठीही पाणी आरक्षित केले हाेते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना यावरही आंदाेलन करेल, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
भाजपचा पलटवार
भाजपवर आरोप करण्यापेक्षा आमदार नितीन देशमुख यांनी आत्मचिंतन करावे, अकोल्याला पाणीपुरवठा करण्यासाठी विरोध करणारे कोण होते, याचा शाेध त्यांनी घ्यावा, असा पलटवार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात यांनी केला आहे. त्याच्या तांत्रिक अडचणीची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. केवळ खोट्या प्रसिद्धीसाठी आराेप करू नये. शहरातील निधी कसा पळवला होता, हेही त्यांनी सांगावे, असेही थाेरात यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.