आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाव्य पाणी टंचाई आराखड्यात उपाय याेजनांना फाटा देण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समिती सदस्यांनी अभियंते, अधिकाऱ्यांना जाब िवचारला आहे. समितीच्या बैठकीत पदाधिकारी-सदस्यांनी उपाय याेजना काढण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके साेसावे लागतात.
काही ठिकाणी तर २-३ कि.मी.पर्यंतही पायपीट करुन पाणी आणावे लागते. अनेक गावात तर पाणी विकतही घ्यावे लागते. गतवर्षी संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना दिलावा मिळावा, यासाठी जि. प. तर्फे जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई निवारण कृती आराखडा सादर करण्यात येताे.जलव्यवस्थापन समिती सभेत आराखड्यावर चर्चा झाली. सभेत अध्यक्षा संगिता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, याेगिता राेकडे, रिजवाना परवीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार उपस्थित हाेते.
यापूर्वीही झाली हाेती चर्चा : पाणी टंचाई कृती आराखड्यावर गतवर्षी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभांमध्येही चर्चा झाली हाेती. अनेक गावात पाणी टंचाई असतानाही उपाय याेजना प्रस्तावित करण्यात आल्या नव्हत्या. परिणामी संबंधित गावातील ग्रामस्थांनी जि.प., पं.स. सदस्यांकडे धाव घेतली हाेती. त्यामुळे सदस्यांनी सभेत अधिकारी-अभियंत्यांना जाब िवचारला हाेता. अधिकाऱ्यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे बाेट दाखवले हातेते. त्यामुळे आता यंदाच्या पाणी टंचाई आराखड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.