आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका. ती समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करणे गरजेचे आहे. बालविवाह होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. येथील मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, शिरपूर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा परिषदेतर्फे शनिवारी तालुक्यातील खंबाळे येथे बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त कृती भूपेश पटेल अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी अंजू पटेल, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, खंबाळेच्या सरपंच सतीबाई पावरा, पोलिस पाटील सुनील पावरा, पंचायत समिती सदस्य दिनेश पावरा, प्रितम पावरा, शिवाजी पावरा, विनेश पावरा, संजय कोळी, सुनील अग्रवाल, रणजित पाटील, भावसिंग पावरा, हिरालाल कोळी, संजय पावरा, ग्रामसेवक आनंदा पावरा आदी उपस्थित होते. सीईओ भुवनेश्वरी एस म्हणाल्या की, बालविवाहामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य आर. एन. पवार यांनी प्रास्ताविक केले. सी. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थिनींसोबत धरला ठेका
कार्यक्रमात आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी बेटी हू मै बेटी हे गीत सादर केले. आदिवासी नारे गीतावर नृत्य केले. विद्यार्थिनीं सोबत सीईओ भुवनेश्वरी एस यांनीही ठेका धरला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.