आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरा जागांसाठी 98 उमेदवार रिंगणात‎:वाढती उमेदवार संख्या लक्षात घेता निवडणूक उमेदवारांना सोपी नाही‎

नांदुरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या अठरा संचालक‎ पदासाठीच्या निवडणुकीसाठी‎ तब्बल ९८ उमेदवार रिंगणात‎ आहेत. उमेदवारी अर्ज मागे‎ घेण्याची अंतिम दि.२० एप्रिल‎ असून त्यानंतर खऱ्या लढतीचे‎ चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या‎ अनेक वर्षांपासून या बाजार‎ समितीवर कधी भाजपची तर‎ कधी संमिश्र आघाडीची सत्ता‎ होती. बरेचदा वेगवेगळे लढणारे‎ पक्ष हे निवडणुकीनंतर सत्तेसाठी‎ एकत्र बसलेले सुद्धा दिसत होते.‎ परंतु आता पहिल्यांदाच काँग्रेस‎ आ.राजेश एकडे यांचे नेतृत्वात‎ महाविकास आघाडीचे व माजी‎ आ.चैनसुख संचेती यांच्या‎ मार्गदर्शनात बलदेराव चोपडे यांचे‎ नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व शिवसेना असे पॅनल बाजार‎ समितीवर सत्ता आणण्यासाठी‎ सज्ज झालेले आहेत.‎

दोन्ही बाजूकडून अद्यापही‎ आपले उमेदवार जाहीर केलेले‎ नसल्यामुळे अनेक उमेदवार पॅनल‎ मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न‎ करीत आहेत. मात्र उमेदवारांची‎ वाढती संख्या पाहता ही निवडणूक‎ त्या प्रमाणात सोपी राहिली‎ असल्याचे चित्र दिसून येते.‎ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या‎ निवडणुकीसाठी महाविकास‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आघाडी व भाजपा शिवसेना अशा‎ सरळ लढतीच्या अपेक्षेतून इच्छुक‎ उमेदवारांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग‎ लावून आपली उमेदवारी पक्की‎ करण्यासाठी जोर लावण्यावर भर‎ दिला आहे. तरी जागा कमी व‎ इच्छुक उमेदवार जास्त असे‎ वातावरण असल्यामुळे दोन्हीही‎ आघाड्यांमध्ये बिघाडी होऊन‎ तिसरे पॅनल टाकण्यासाठी पण‎ हालचाली सुरू झालेल्या दिसत‎ आहेत.

महाविकास आघाडी‎ विरुद्ध भाजप शिवसेना या‎ सध्याच्या सत्ता संघर्षाच्या‎ फार्मूल्याचा विचार करता‎ आजी-माजी आमदार यांचा‎ बोलबाला या निवडणुकीत‎ नक्कीच पाहावयास मिळणार‎ आहे. प्राप्त माहितीनुसार,‎ भाजपा व शिवसेना शिंदे गट या‎ पक्षाची युती झाली असून सहा‎ जागा शिवसेनेसाठी सोडण्यात‎ आल्या असून उर्वरित जागा‎ भाजपा लढवणार आहे. तर‎ महाविकास आघाडी करून‎ लढणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे‎ गटांने केवळ दोन जागांवर‎ समाधान मानत राष्ट्रवादी‎ काँग्रेसला सहा जागा व उर्वरित‎ जागा काँग्रेस निवडणूक लढणार हे‎ ठरले आहे. दरम्यान, आगमी‎ काळात होणाऱ्या निवडणुकीमुळे‎ या निवडणुकीत विजय‎ मिळवण्याासाठी सर्वच पक्षाकडून‎ मोर्चेबांधी केली जात आहेे‎