आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक उपक्रम:कारगिरांनी नव्या तंत्रज्ञानाची‎ कास धरावी ; विश्वकर्मा जयंतीनिमित्त भागवत कथेची सांगता‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त‎ श्री विश्वकर्मामय पांचाळ‎ समाज मंडळातर्फे श्रीमद्‎ संगीत भागवत कथा‎ महायज्ञाचे आयोजन करण्यात‎ आले हाेते. या कथेची सांगता‎ शुक्रवारी झाली.‎ कारगिरांनी नव्या‎ तंत्रज्ञानाची कास धरावी, असे‎ आवाहन बुलडाणा‎ जिल्ह्यातील मेहकर येथील‎ आमदार डाॅ. संजय रायमुलकर‎ यांनी याप्रसंगी केले. डाॅ.‎ रायमुलकर यांनी बदलत्या‎ काळात विश्वकर्मा वंशीयांनी‎ परंपरागत व्यवसायाला नव्या‎ तंत्रज्ञानाची जाेड दिली पाहिजे,‎ युवकांनी नव्या संधीचा शाेध‎ घेऊन करिअरची निवड‎ करावी, असे आवाहन केले.‎ विश्वकर्मा समाजाने संघटीत‎ हाेत समाजाच्या उत्थानासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याेगदान द्यावे, असेही त्यांनी‎ स्पष्ट केले.‎ भागवत कथा २७ जानेवारी‎ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत‎ झाली.

मोठी उमरी येथील श्री‎ विश्वकर्मा मय सभागृह येथे‎ भगवान विश्वकर्मा,‎ गणेशमूर्ती, विठ्ठल-रुक्मिणी‎ मूर्ती व संत श्री गजानन‎ महाराज मूर्तींची प्रतिष्ठपणा‎ करण्यात आली. शुक्रवारी‎ विश्वकर्मा जयंतीचा मुख्य‎ कार्यक्रम झाला. सकाळी श्री‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विश्वकर्मा पूजन व होमहवन‎ झाले. त्यानंतर बेलुरा येथील‎ भागवताचार्य महेश महाराज‎ मारवाडी यांच्या काल्याचे‎ कीर्तन झाले. कीर्तनानंतर‎ आयाेजित कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी श्री‎ विश्वकर्मामय पांचाळ समाज‎ मंडळाचे अध्यक्ष राम यवतकर‎ हे हाेते.

या वेळी मंचावर‎ मेहकरचे आमदार डॉ. संजय‎ रायमुलकर, विजय खाेलगडे,‎ वसंतराव खोलगाडे, संजय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लाखेकर, दिनकरराव‎ बलंमकर, अरुण वरुळकर,‎ गजानन सावरकर, प्रा. विवेक‎ शास्त्रकार, किशाेर फुलकर‎ सुरेश राजहंस, संताेष‎ वाघमारे, वामनराव राजहंस,‎ माणिकराव पुनकर, दामाेदर‎ अंजनकर, रामेश्वर सुरते,‎ केशव वडतकर, गणेशराव‎ वडतकर आदी उपस्थित हाेते.‎ प्रास्ताविक राजहंस यांनी केले‎ तर संचालन हत्यारकर यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...