आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सम्राट अशोक यांनी लोकशाही‎ मूल्ये रुजवली : प्रा. आठवले‎

अकाेला‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन भारताच्या इतिहासातील‎ महान सम्राट अशोक यांचे ,‎ लोककल्याणकारी आणि आदर्श‎ प्रशासकीय धोरण हेच भारताच्या‎ सामाजिक,शैक्षणिक‎ आर्थिक,सांस्कृतिक सर्वागीण‎ विकासासाठी उपकारक ठरले‎ असून त्यांनी पहिल्यांदाच‎ भारतातील राजकीय व्यवस्थेत‎ लोकशाही मूल्ये रुजविली असे‎ प्रतिपादन सम्राट अशोक प्रतिष्ठानचे‎ अध्यक्ष प्रा विजय आठवले यांनी‎ केले. ते उमरी येथील विश्र्वशांती‎ बौद्ध विहारातील एकदिवसीय धम्म‎ ध्यान शिबिरात बोलत होते.‎ प्रारंभी भगवान बुद्ध,महात्मा‎ फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात‎ आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव‎ पळसपगार हे होते. उदघाटक म्हणून‎ जयंत मसने हे हाेते. कार्यक्रमाला‎ प्रमुख अतिथी म्हणून जे.के.पळस‎ गार,सुभाष खंडारे ,प्रकाश‎ पळसपगार,आत्माराम पळसपगार,‎ विनोद परघरमोर, लीलाबाई‎ पळसपगार, प्रा. डॉ बाळकृष्ण‎ खंडारे, प्रा डॉ संदीप भोवते,‎ विद्याधर मोहोड, निरंजन वाकोडे‎ अनिल गवई म्हणून उपस्थित हाेते.‎ महाेत्सवात सहभागी व्हा‎ सम्राट अशोक यांचे भारताच्या‎ जडण घडणीत प्रचंड योगदान‎ असतानाही सरकारच्यावतीने‎ त्यांची जयंती साजरी केल्या जात‎ नाही. ही शोकांतिका अाहे, असे‎ नाही, असे प्रा. अाठवले म्हणाले.‎ ३१ मार्च रोजी आयोजित सम्राट‎ अशोक पर्व महोत्सवात मोठ्या‎ संख्येने उपस्थित राहून महान‎ सम्राटाचा प्रत्येकाने सन्मान करावा‎ , असे आवाहन त्यांनी केले.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश‎ पळसपगार यांनी केले. सूत्र‎ संचालन जे.के. पळसपगार यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...