आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व शिक्षा अभियान:कर्मचाऱ्यांना अन्य‎ कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत घ्या‎ ; शिक्षक आमदारांना दिले निवेदन‎

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सर्व शिक्षा अभियातीलनातील‎ कर्मचाऱ्यांना अन्य‎ कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत‎ सामावून घ्या,’ अशी मागणी‎ अभियानातील कर्मचाऱ्यांकडून‎ िशक्षक आमदार किरण सरनाईक‎ यांच्याकडे करण्यात आली.‎ सर्व शिक्षा अभियानअंतर्गत गत‎ २० वर्षांपासून निव्वळ करार‎ तत्त्वावर ५ हजार ८०० पेक्षा जास्त‎ कर्मचारी विविध पदावर अल्पशा‎ मानधनावर कार्यरत आहेत.‎ कार्यालयात रिक्त असणाऱ्या इतर‎ पदाचा अतिरिक्त भार या‎ कर्मचाऱ्यांवर आहे. विनंती‎ करूनही शासनाने अद्यापपर्यंत या‎ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नियमित केलेले नाही.‎ अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा व‎ इतर कोणत्याही सोयी सुविधांचा‎ लाभ दिलेला नाही.‎ सरकारी धोरणानुसार करार‎ कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरवर्षी‎ नैसर्गिक वाढ मंजूर करण्यात येते.‎‎‎‎‎

‎‎‎‎‎‎‎‎तथापि, सन २०१८-१९ पासून अशी‎ कोणतीही वाढ आमच्या‎ मानधनात शासनाने केलेली नाही.‎ नोकरीतील असुरक्षितता व‎ मानसिक आर्थिक विवंचनेत‎ आमचा प्रत्येक कर्मचारी जीवन‎ जगत आहे. उच्च शैक्षणिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पात्रता व प्रदीर्घ अनुभव लक्षात‎ घेता, आमची शिक्षण विभागाला‎ अत्यंत आवश्यकता आहे, असे‎ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. रिक्त‎ पदांचा भार पडत असल्यामुळे‎ याबाबत विचार करावा असे‎ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.‎‎

या केल्या मागण्या‎सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना समान काम‎ समान वेतन लागू करावे.‎वेतनात १ जानेवारी २०२२पासून किमान दुप्पट वाढ‎ करण्यात यावी.‎शासनाकडून किमान ५० लाख परत मिळतील,‎ अशा आरोग्यदायी वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळावा.‎अपघात जीवन विमा योजना कवच सेवा-‎ सुविधांचा लाभ मिळावा. अकाेला- आमदार िकरण‎ सरनाईक यांना िनवेदन सादर करताना सर्व िशक्षा‎ अभियानातील कर्मचारी व शिक्षक.‎

बातम्या आणखी आहेत...