आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका क्षेत्रातील मुख्य मार्गावर पुढील आठवड्यात साेमवार १३ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान मुख्य मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वत: अतिक्रमण काढावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने नोव्हेंबरपासून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत तीन मोहीमा राबवल्या असून, अद्यापही मोहीम सुरुच आहे. मात्र आता पुन्हा साेमवार १३ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे.
उत्तर झोन अंतर्गत गांधी चौक ते सिटी कोतवाली चौक ते टिळक रोड ते मानेक टॉकीजपर्यंत, माळीपुरा चौक ते मोहता मिल स्मशान भूमी ते तपे हनुमान मंदीरपर्यंत, मनकर्णा प्लॉट ते तपे हनुमान मंदीरपर्यंत याचसोबत पश्चिम झोन अंतर्गत सिटी कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्ला चौकापर्यंत आणि किल्ला चौक ते हरिहरपेठ ते वाशीम बायपास चौक या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. या मार्गावर ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्या अतिक्रमण करणाऱ्यांनी आपले अतिक्रमण स्वत: काढावे अन्यथा महापालिका अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने केलेले अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.