आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपासून महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मुख्य मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहीमेदरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व व्यावसायिक यांच्यात झटापट झाली. मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र नंतर ही परिस्थिती निवळली.
शहरातील मुख्य मार्गावर व मुख्य मार्गाच्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दुकाने थाटण्यात येतात. रस्त्यावरच हातगाड्यांवर विविध साहित्याची विक्री होते. परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. त्यामुळे काही दिवसांपासून मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान 10 डिसेंबर रोजी सकाळी मनपाने गांधी रोडपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीमेला प्रारंभ केला. ही मोेहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल, गांधी चौक, गांधी रोड, महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली) या मार्गाने राबविण्यात येत आहे.
कुठे काय घडले?
गांधी रोडवर वाहतुकीची कोंडी
मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानंतर गांधी रोडवर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक या दरम्यानची वाहतूक संत गतीने सुरू होती.या घटनेची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांना काही नागरिकांनी कळवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.