आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा‎:खासगीकरणाच्या विरोधात निघालेली‎ ईव्हीएम भंडाफोड यात्रा आज जिल्ह्यात‎

अकाेला‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगीकरणाला िवराेध करत भारत‎ मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती माेर्चातर्फे‎ जिल्ह्यात गुरुवारी मोर्चातर्फे ईव्हीएम‎ (इलेक्ट्राॅनिक व्हाेटिंग मशीन)‎ भंडाफोड परिवर्तन यात्रा गुरूवारी‎ जिल्ह्यात दाखल होणार आहे.‎ यात्रेच्या अंतर्गत बाळापूर येथील‎ काॅटन मार्केटमध्ये सभा हाेणार आहे.‎ भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा‎ काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत‎ निघाली होती. मात्र नंतरच्या काळात‎ काेराेनामुळे ही राष्ट्रव्यापी परिवर्तन‎ यात्रा आंध्र प्रदेशापर्यंत जाऊ‎ शकली. आता इव्हीएम भंडाफोड‎ परिवर्तन यात्रा भाग-२ चा प्रारंभ‎ महाराष्ट्रातून झाला आहे.

महाराष्ट्रात‎ २१ फेब्रुवारी २०२३पासून सुरू‎ झालेली यात्रा परिवर्तन १३ मार्च‎ २०२३ पर्यंत चालणार आहे. यात्रा‎ भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संयोजक, बहुजन क्रांती मोर्चाचे‎ प्रमुख वामन मेश्राम यांच्या‎ नेतृत्वाखाली निघाली आहे.‎ दरम्यान, बाळापूर येथे ९ मार्च राेजी‎ सभा हाेणार असून, उद्घाटन‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎ रविकांत तुपकर हे करणार आहेत.‎ कार्यक्रमाला विविध समाजांचे‎ प्रमुख, सामाजिक संघटना, संस्थांचे‎ पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून‎ उपस्थित राहणार आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ‘इव्हीएम’मध्ये घाेळ : सन २००४‎ च्या नंतर निवडणुकांमध्ये राष्ट्रीय‎ राजकीय पक्षांना बहुजन मिळण्यास‎ प्रारंभ झाला. इव्हीएममध्ये हेराफेरी‎ करत बहुमत प्राप्त करून सरकार‎ स्थापन करण्यात आल्याचा आराेप‎ भारत मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती‎ माेर्चाने केला आहे. ईव्हीएमच्या‎ िवराेधात काँग्रेस-भाजप‎ बाेलण्यास तयार नाही, असेही‎ माेर्चाचे म्हणणे आहे.‎‎

सरकारी उद्याेग कवडीमोल भावात विकल्याचा आरोप‎
देशात काँग्रेस व भाजप सरकारांनी मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केले. आजही‎ खासगीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकारी उद्योग‎ कवडीमोल भावात उद्योगपतींना दिले. मोठ्या प्रमाणात करमाफी देण्यात आली,‎ असा आराेप भारत मुक्ती माेर्चा, बहुजन क्रांती माेर्चातर्फे करण्यात आला आहे.‎ या खासगीकरणामुळे आरक्षण शून्य झाले असून, एससी, एसटी, आेबीसीचा‎ रोजगार संपला व त्या उपक्रमाच्या फायद्यातून चालणाऱ्या जुनी पेन्शन व‎ सामाजिक योजनाही बंद झाल्या. या खासगीकरणाच्या विरोधात ही परिवर्तन‎ यात्रा आहे, असेही माेर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...