आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागांधीग्राम येथील ब्रिटिशकालीन पूल नादुरुस्त झाल्याने नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरुपाचा पर्यायी मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गावर नदीपात्रातील पाण्यापासून केवळ २ मीटर उंचीचा पूल तयार हाेत आहे. वास्तविक सुमारे १० मीटर उंचीच्या ब्रिटिशकालीन पूलावरूनच ६ मीटरपर्यंत पुराचे पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद असताे.
पूर आेसरल्यानंतरही नदीपात्रात प्रचंड पाणी असते. त्यामुळे हा तात्परता मार्ग पुरात वाहून न गेल्यासही या पर्यायी मार्गाचा वापर वर्षभरात ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ हाेणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या तात्पुरत्या कामासाठी ४ काेटी रुपये मंजूर करण्यात आले असून, आतापर्यंत १ काेटी ९९ लाखांचे देयकही अदा करण्यात आले आहे. ब्रिटिशकालीन पूल नादुरुस्त असल्याने १८ आॅक्टाेबर २०२२ राेजी वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीय संघर्ष समितीने धरणे आंदाेलन केले. अखेर नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरुपाचा पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून डिसेंबरमध्ये काम सुरू केले.
पुलावरुन सुरू आहे जीवघेणी वाहतूक
मार्गाचे खाेदकाम सुरू असून, चढ व उतार आहे. त्यामुळे चालकांना अतिशय सावध राहूनच वाहन चालवावे लागते. रुग्ण किंवा लहान बाळाला कडेवर घेऊन महिलेला दुचाकीवर बसून प्रवास करणे अतिशय धाेकादायक आहे. वृद्धांना दुचाकीवरून बसून प्रवास करताना सावधानता बाळगावी लागत आहे. या पर्यायी मार्गाचा वापर वर्षभरात ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ हाेणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.