आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:गारपिटीने दाेन तालुक्यांत 528 ‎ हेक्टर फळबागा, िपकांची हानी‎

पातूर/अकाेला‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर तालुक्यात शनिवारीही काही‎ िठकाणी गारपीट व पाऊस झाला.‎ त्यामुळे फळबागा व रब्बी‎ हंगामातील पिकांचे दुसऱ्या‎ दिवशीही नुकसान झाले. दरम्यान‎ पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात‎ शुक्रवारी गारपीट व अवकाळी‎ पावसामुळे फळबाग, रब्बी‎ हंगामातील पिकांच्या नुकसानाचा‎ अहवाल शनिवारी िजल्हाधिकारी‎ कार्यालयाकडून िवभागीय आयुक्त‎ कार्यालयात पाठवण्यात आला. या‎ पावसामुळे पातूर व बार्शीटाकळी‎ तालुक्यातील ४१९ शेतकऱ्यांचे ५२८‎ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎ झाल्याचा प्राथमिक अंदाज‎ अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत‎ खरीप हंगामात जून ते सप्टेंबर‎ दरम्यान प्रचंड पाऊस झाला हाेता.‎ परिणामी खरीप हंगामातील उत्पादन‎ प्रचंड घटले हाेते. त्यानंतर‎ ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाचाही‎ पिकांना फटका बसला हाेता. खरीप‎ हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात‎ भरून काढू, असा िनर्धार करीत‎ शेतकरी कामाला लागले हाेते.

मात्र‎ शुक्रवारी संध्याकाळी बार्शीटाकळी‎ व पातूर तालुक्यात काही ठिकाणी‎ वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट‎ झाली हाेती.‎ येथे झाला पाऊस : शनिवारी‎ पातूर तालुक्यात सायंकाळी‎ आलेगाव परिरसात पाऊस झाला.‎ आलेगाव ते डाेंगरगाव मार्गावर‎ गारपीट झाली. पांगरताटी, उमरा,‎ राहेेर अडगाव, उमरवाडी,‎ पिंपळडाेली, नवेगाव, चाेंढी,‎ पांढुर्णा, चिखलवाड, उमरवाडी,‎ पाचरण, दधम, पहाडसिंगी,‎ गावंडगाव या परिसरात पाऊस‎ झाला. रस्त्यावर गाराचा खच‎ साचला हाेता.‎ या पिकांची हानी : अवकाळी‎ पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा,‎ भुईमूग, संत्रा, टरबुज, मोसंबी, मूग,‎ पपई पिकांची हानी झाले आहे.‎ शेतात सोंगून ठेवलेला हरभरा व गहू‎ पावसामुळे भिजला आहे. संत्रा,‎ मोसंबी, पपई या फळबागांना वादळी‎ वाऱ्यांचा फटका बसला आहे.‎

पातूर तालुक्यात शुक्रवारी १६.३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे २८७‎ शेतकऱ्यांचे अंदाजे ३७४ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. बार्शीटाकळी‎ तालुक्यात ५.८ मिमी पाऊस झाला. त्यामुळे १५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎ झाले, तर १३२ शेतकऱ्यांना गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला.‎

बातम्या आणखी आहेत...