आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाला असून, पुरवठ्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही हा विषय गाजला. यावर कृषी विभागाने पुरवठ्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्यात तीन वेळा प्रचंड अतिवृष्टी झाली. परिणामी शेतात पाणी साचले. शेतकऱ्यांना शेतात जाणेही शक्य नव्हते. मात्र तीन-चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, ऊन पडत आहे. त्यामुळे शेतीची कामे करणे शेतकऱ्यांना असून, सध्या खतही देता येते.
पिकांना खताची गरजही आहे. मात्र खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे तातडीने खत उपलब्ध देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि.प.गट नेते गाेपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांना सादर केलेल्या निवेदनात केली हाेती.
२५ जूननंतर उपलब्धच नाही खरीप हंगामात आताच खताची अत्यंत आवश्यकता असून, खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २५ जूननंतर जिल्ह्यात खताच्या बॅगच उपलब्ध झाल्या नाहीत. मात्र खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खताची दोन दिवसात तत्काळ उपलब्धता करण्यात यावी; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेने दिला.
असे आहे खताच्या पुरवठ्याचे चित्र
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ साठी खताचे आवंटनन ८३ हजार ३१० मे. टन मंजूर होते. प्रत्यक्षात आतापर्यंत २३ हजार ४५१ मे.टन व मार्गील वर्षीचे शिल्लक २१ हजार ७३४ मे. ट. असे एकूण ४१ हजार टन खत अद्याप प्राप्त झालेले नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.