आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदूर बाजार लांबलेल्या मान्सूनमुळे पावसानेही तालुक्यांकडे पाठ फिरवली आहे. मृगाच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी निराशाच आली आहे. पेरणीयोग्य पावसाने अद्यापही तालुक्यात हजेरी न लावल्याने पेरणी खोळंबली असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे वळत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात व त्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी पेरणी करीत उत्पादन घेतले, परंतु शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी येईल त्या भावात,शेतामालाची विक्री केली. रब्बी हंगामात कोसळलेल्या अवकाळी पावसाने कांदा, गहू, हरभऱ्यासह भाजीपाला पिकांना दगा दिला.
त्यामुळे चांगल्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. अशाही परिस्थितीत या वर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली, परंतु जून महिन्याचा मध्यान्ह उलटायला आला, तरी पावसाने हजेरी नाही. परिणामी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीच्या मशागतीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. डिझेल दरवाढीचा फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागला. मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचे वातावरण तयार होऊ लागले आहे, परंतु आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या पदरी निराशाच पडली .
बेमोसमी पावसाचा फटका : दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती पिके न आल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. शेतीमाल भाव नाही. शेतमाल विकून आलेल्या अल्पशा पैशातून बी-बियाणे, खते मजुरी आदीचे नियोजन होणार नाही म्हणून शेतकरी उसनवारी करताहेत. तर बेमोसमी चा फटका बसू नये, अशी प्रार्थना शेतकरी करताहेत. खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.