आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा जलयुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार‎

अकोला‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा जलयुक्त व्हावा, यासाठी‎ भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला‎ असून, यासाठी संघटनेने िनती‎ आयाेगाशी सांमजस्य करारही केला‎ आहे. जिल्हा पाणीदार हाेण्यासाठी‎ संघटनेकडून विविध उपाय याेजना‎ करण्यात येणार आहेत.‎ देशाच्या विकासात जैन समाज‎ आपले योगदान देतच आला असून,‎ आता भारतीय जैन संघटनेच्या‎ (बीजेएस) माध्यमातून जिल्हा‎ जलयुक्त करण्यात येणार असल्याची‎ माहिती भारतीय जैन संघटनेचे‎ नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर सांखला‎ यांनी दिली आहे. शास्त्रीनगरातील जैन‎ स्थानकांत झालेल्या सभेत सांखला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी अन्य संबधित माहितीही दिली.‎ अकाेल्यासह देशातील १०० िजल्हे‎ जलयुक्त करण्यात येणार आहेत. या‎ वेळी त्यांनी संघटनेच्या वतीने‎ राबवण्यात येत असलेल्या विविध‎ प्रकल्पांची माहिती दिली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सभेला नवनियुक्त राज्य सचिव‎ दीपक चोपडा, विभागीय अध्यक्ष‎ संजय आंचलिया, प्रा. सुभाष गादीया,‎ दिलीप जैन, चंद्रशेखर चोरडिया आदी‎ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.‎

या वेळी किशोर बोथरा, प्रा. दिलीप‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ डोणगावकर आणि प्रा. सुहास‎ उदापूरकर यांच्या हस्ते नवनियुक्त‎ अध्यक्ष नंदकिशोर सांखला आणि‎ सचिव दीपक चोपडा यांचा शाल‎ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात‎ आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ‘बीजेएस’चे जिल्हाध्यक्ष किशोर‎ बोथरा, शहर सचिव संजीव जैन,‎ विभागीय उपाध्यक्ष नरेश चौधरी,‎ अमरिश पारेख यांनी पाहुण्यांचे स्वागत‎ केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष गादीया‎ यांनी केले. या वेळी दीपक चोपडा‎ यांनी विचार व्यक्त केले. या वेळी‎ ‘डीआरसीसीयु’चे नवनियुक्त सदस्य‎ विमल जैन यांचा नंदकिशोर सांखला‎ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीप इंदाने‎ यांनी केले. आभार ममता जैन यांनी‎ मानले. या वेळी किशोर बोथरा,‎ अमरिश पारेख, डॉ. स्मिता शहा,‎ ममता जैन, मंजुषा जैन, अस्मिता‎ नांदेडकर, नरेश चौधरी , रमेश चौधरी,‎ प्रा. दिलीप डोणगावकर, प्रा. सुहास‎ उदापूरकर, प्रशांत कोठारी , प्रवीण‎ कर्नावट, प्रविण कोठारी, शीतल शहा,‎ विवेक कान्हेड, रवी जैन, महेश‎ बोडखे, शीतल खाबिया, रमेश‎ तोरावत, जितेंद्र बोरा, सुमित चौधरी ,‎ कोमल बलदोटा, रितेश खाबिया‎ प्रामुख्याने उपस्थित होते.‎

गाळाचा उपसा; खोलीकरणाचे कार्य‎
जिल्ह्यात बीजेएसतर्फे गत पाच‎ वर्षात जल संधारणाशी िनगडीत‎ प्रचंड कार्य झाले. सुजलाम‎ सुफलाम प्रकल्पांतर्गत गाळाचा‎ उपसा, खोलीकरण करण्यात आले.‎ अकाेला तालुक्यात तर चार लाख‎ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात‎ आला हाेता. यात्ून ४० कोटी लिटर‎ अतिरिक्त पाणी साठवण व‎ झिरपण्याची क्षमता निर्माण झाली.‎ २०१९ मध्ये तर संघटनेने ३५‎ पोकलेन आणि जेसीबी मशीन‎ पुरवल्या होत्या. या मशीनद्वारे‎ ७,६८० तास काम करण्यात आले.‎ तालुक्यातील जवळपास २५‎ गावातील हजारो शेतकऱ्यांना याचा‎ लाभ झाला हाेता. यंदाही आता‎ जलसंधारणाचे कार्य हाेणार आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...