आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘देशात तयार होणारा सक्षम युवक नोकरीसाठी विदेशात जातो, तिथेच स्थायिक होताे. यामुळे देशातील बैद्धिक संपदा विदेशात जात आहेत. परिश्रम आपले आणि नफा विदेशी कंपनी कमावतात. हे दृष्टचक्र असेच सुरू राहिल्यास भविष्यातील उज्ज्वल भारत कसा तयार होईल. त्यामुळे विदेशी नोकरीचे फॅड कमी होऊन युवकांनी देशात नोकरी किंवा व्यवसायास प्राधान्य द्यावे. डिजिटल युगात भारतामध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन काँफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी केले. श्री खंडेलवाल वैश्य सभातर्फे व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी खंडेलवाल भवन सभागृहात व्यापार परिसंवाद दृष्टीक्षेप २०३० झाले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भरतीया मार्गदर्शन करीत होते. या वेळी मंचावर काँफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, आममदार वसंत खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक दालमिया, खंडेलवाल वैश्य सभाचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, २०३० ची व्यापारी व उद्योगाची संकल्पना लक्षात घेता आतापासूनच नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. व्यापाऱ्यांना नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. टाईमली, कम्पलेटली व करेक्टली हे सूत्र नव्या जोमाने अंगीकारावे लागणार आहे. आपल्या मुलाबाळासमवेतच महिला व युवकांनाही या क्षेत्रात नव्या जोमाने आले पाहिजे. कारण युवा आज देशाची शान आहे. मुलगी पण ही घराची लेक, सून, आई आहे. अशा महिलांना उद्योग क्षेत्रात आणून त्यांना नव्या तंत्रज्ञानाने अवगत करून त्यांच्या हातात व्यापाराची दोरी देणे आता काळाची गरज झाली असल्याची भरतीया यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमात कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक दालमिया यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत खंडेलवाल वैश्य सभेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, विदर्भ चेंबरचे पदाधिकारी आशीष चंदाराणा, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, मनीष खंडेलवाल, संजय सेठी, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, विजय पनपालिया, शैलेंद्र कागलीवाल, होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत खेतान, कॅटचे प्रांतीय उपाध्यक्ष वसंत बाछुका, ऑइल मिल ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुप्ता, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद खंडेलवाल, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे आदींनी केले. संचालन वैश्य सभेचे रमाकांत खंडेलवाल यांनी केले. खंडेलवाल वैश्य सभेचे सचिव रवींद्र खंडेलवाल यांनी आभार मानले.
व्यापाऱ्यांनी डिजिटल होणे काळाची गरज : प्रवीण खंडेलवाल कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनीही २०३० ची संकल्पना विशद केली. ते म्हणाले, व्यापारात डिजिटलीकरण वाढत आहे. रिझर्व बँकेनेही आता डिजिटल रुपया निर्माण केला आहे. यामुळे आता चेक बुकची संकल्पना ही हळूहळू नाहीशी होत आहे. शासन डिजिटल रुपये बाजारपेठेत आणून रोख रक्कम बाजारपेठेतून हळूहळू नाहीशी होणार आहे. वास्तविक ही काळाची गरज असून, व्यापाऱ्यांनी पण स्वतःहून डिजिटल होणे आता काळाची गरज ठरली आहे.
गत काही वर्षापासून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी किरकोळ बाजारावर आक्रमण केले असून, छोट्या वस्तू ही अशा कंपन्या घरपोच देत आहेत. कॅटने अशा बाबीची दखल घेऊन न्यायालयीन लढा लढवून विजय प्राप्त केला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. व्यापार संमेनात यावर मंथन - लोकसंख्या ५० टक्के वाटा, महिलांना आर्थिक सक्षम करा - २०२५ च्या स्वप्नातील भारतावर मंथन व्हावे - लग्नानंतर महिलांना व्यापारात सक्रीय ठेवा - आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे फॅड कमी व्हावे - मुलांना व्यापाराचे धडे आवश्यक - आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात निर्माण करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.